वेधशाळेच्या अंदाजाने नदीकाठ पुन्हा धास्तावला : शेतकऱयांची पिके काढण्याची धांदल
प्रतिनिधी/सांगली
यंदाच्या पावसाळ्यामध्ये कृष्णा खोऱयात दमदार पाऊस झाल्याने कोयना, वारणा या धरणासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. आता पुन्हा वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यातच मान्सूनने अद्यापही माघार घेतलेली नाही. त्यामुळे कृष्णा-वारणा काठाला पुन्हा पूर येण्याची धास्ती लागून राहिली आहे.
सोयाबीनसह खरीप हंगामातील पिके काढणीला आली आहेत. शेतकऱयांची धांदल सुरू आहे. अशातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिह्यात तीस टक्क्याहून अधिक द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्या आहेत. तुरळक पावसाच्या सरी आणि वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर वातावरण ढगाळ असल्याने याचा फटका छाटण्या झालेल्या द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे बळीराजासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
वारणा, अलमट्टीसह बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिह्यातील नद्यांच्या पाण्यावर परिणाम करणारी सर्व धरणे जवळपास भरली आहेत. कोयना, वारण, अलमट्टीसह अनेक छोटी भरणे शंभर टक्के भरली आहेत. सोमवारी वारणा धरणात 34.40 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे. कोयनेची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी असून सध्या 103.31 टीएमसी आहे. याशिवाय कोल्हापूर जिह्यातील राधानगरी, तारळी, उरमोडी तसेच सातारा जिह्यातील कण्हेर, धोम आदी धरणे पावसाने काठोकाठ भरली आहेत.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे : कोयना 103.31 (105.25), धोम 13.20 (13.50), कन्हेर 10.03 (10.10), दूधगंगा 25.39 (25.40), राधानगरी 8.20 (8.36), तुळशी 3.46 (3.47), कासारी 2.76 (2.77), पाटगाव 3.67 (3.72), धोम बलकवडी 4.07 (4.08), उरमोडी 9.49 (9.97), तारळी 5.62 (5.85), अलमट्टी 123.08 (123).
विसर्ग कमी केले
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सोडलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे : धोम 698, कण्हेर 324, वारणा 1418, दूधगंगा 600, राधानगरी 700, तुळशी 252, कासारी 250, पाटगाव 225, धोम बलकवडी 319 व अलमट्टी धरणातून 12 हजार 15 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज 14 (634.4), जत 11.1 (615.5), खानापूर – विटा 11.8 (428.3), वाळवा इस्लामपूर 1.7 (762.9), तासगाव 10.6 (504.5), शिराळा 1.1 (1555.9), आटपाडी 10.2 (410.8), कवठेमहांकाळ 16 (413.2), पलूस 0.3 (637.2), कडेगाव 1.7 (519.6).