डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळे झाल्याची दळवी यांनी दिली माहिती
सातारा/प्रतिनिधी
कोयना धरण होऊन 60 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला आहे. पण त्या पात्र खातेदारांची निश्चित यादी करण्यात आली नव्हती. पुनर्वसन कायदा सुद्धा अस्तित्वात नव्हता. त्या दोन्ही वेळी जेव्हा जेव्हा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे हे दोन्ही महत्वाचे निर्णय लागू झाले आहेत.पात्र खातेदारांची संख्या निश्चित झाली असल्याची माहिती चैतन्य दळवी यांनी दिली.
कोयना धरण ग्रस्त समस्यांचा गर्तेत असून त्यामुळे गेल्या 60 वर्षाहून अधिक काळ चाललेली कोयना धरणग्रस्ताची ससेहोलपट आता काही प्रमाणात कमी होणार आहे. निश्चित झालेले पात्र खातेदार व त्यातून मिळणारे पुनर्वसन संबंधीत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या व सातत्याने चिकाटीने पाठपुराव्याने अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दोन वेळा व सध्याचे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना याबाबत आंदोलनाची दाखल घेऊन कोयनेच्या प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात भाग पाडले आहे.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांच्या विविध प्रश्न सोडवण्याचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे कोयना धरणग्रस्तांच्या गावा गावात जल्लोष करण्यात आला. आपल्या हक्काची लढाईचा एक टप्प्या जिंकला असल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर कोयना धरणग्रस्तांचा इतिहास सुवर्ण अक्षराने श्रमिक मुक्ती दलाने रचला. यावेळी संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, मालोजीराव पाटणकर ,संतोष गोटल, महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, बळीराम कदम, श्रीपती माने उपस्थित होते.
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू झाल्यावर ज्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नाची व्यथा जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, तत्कालीन मुख्यमंत्रीचे अप्पर मुख्य प्रधान सचिव प्रवीण परदेशी, भूषण गगराणी, नंदकुमार काटकर, रामचंद्र शिंदे, तत्कालीन अतिरीक्त जिल्हाधिकारी कै साहेबराव गायकवाड, आरती भोसले, समीक्षा चंद्रकांर, जगदीश निंबाळकर, अनिल ढिकले, सुनीलकुमार मुसळे सर्व गावचे तलाठी मंडलाधिकारी तिन्ही तालुक्याचे तहसीलदार यांचे विशेष आभार कोयना धरणग्रस्तनी मानले.