प्रतिनिधी/ रत्नागिरी
दुसऱया सिंचन आयोगाने कोयनेचे अवजल चिपळूणमध्ये येते त्या परीसरातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रामधील 11 ठिकाणी पुन्हा वीज निर्मिती होवू शकले असा निष्कर्ष काढला आहे. अशा ठिकाणी वीजनिर्मितीसाठी प्रयत्न झाल्यास वीजनिर्मितीक्षमता वाढण्याबरोबरच प्रामुख्याने चिपळूणमधील पूरस्थितीवर मात शक्य असल्याचे मत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु ड़ॉ श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले आह़े
चिपळूणमध्ये यंदा अभूतपूर्व पुरस्थितीमुळे नागरीकांचे मोठे नुकसान झाले आह़े या तडाख्यातून चिपळूणचे नागरीक अद्यापही सावरलेले नाहीत़ पुरामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे ड़ॉ कद्रेकर म्हणाल़े ते म्हणाले की, दुसऱया सिंचन आयोगाने संपूर्ण पाणलोट क्षेत्राची पाहणी करुन चिपळूण परीसरातील पुन्हा वीजनिर्मिती करता येईल अशी 11 ठिकाणे सुचवली आहेत़ यामध्ये चिपळूण तालुक्यातील नागायने, वडगाव, करपुंदवाडी तर खेड तालुक्यातील जगबुडी, जोग, वाकी, व न्यू मांडवे कुडन ब्रदुक, कोजेशी, मधलीवाडी, वैतरणी आदी क्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी सुमारे 2 हजार मेगावॅट वीजेची निर्मिती शक्य आह़े तसेच यासाठी त्या-त्या ठिकाणी पाण्याचे साठे तयार होवून चिपळूणचा पुराचा धोकाही कमी होण्यास मदत होणार आह़े त्यामुळे या वीजनिर्मितीचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी ड़ॉ कद्रेकर यांनी केली आह़े
सिंचन आयोगाच्या बृहत आराखडय़ामध्यील या 11 वीजनिर्मिती केंद्रापैकी 4 वीजनिमिर्ती केंद्रे जपान व महारष्ट्र सरकार यांच्या सहकार्यातून तर 7 राज्यामार्फत उभारवी असा आराखडा असल्याची माहिती ड़ॉ कद्रेकर यांनी दिल़ी या वीजनिमिर्ती केंद्रामुळे पाणी अडवले जाऊन पुरस्थितीवर नियंत्रण आणता येणार आह़े