शेतकऱयांचे लाखेंचे नुकसान
पालये / वार्ताहर
कोरखण चणई ते पालये पठार पर्यंत अंदाजे 63 हजार चौरस मीटर क्षेत्रफळांतील काजू बागायतीला आज बुधवार दि.31 रोजी आग लागून स्थानिक बागायतदारांना लाखो रुपयांची नुकसानी झाली.घटनास्थळी पेडणे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले परंतु वाहन डोंगरमाथ्यावर नेणे शक्मय नसल्याने शक्मय होईल तेवढी मालमत्ता वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
नुकसानग्रस्त स्थानिक बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार दि.31 रोजी सकाळी 11 वा.दरम्यान कोरखण चणई व पालये पाठरादरम्यान आगीचे धूर येऊ लागला व हळू हळू आगीने पेट घेतला.आग आटोक्मयांत येत नसल्याने लागलीच पेडणे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी लागलीच दाखल झाले मात्र डोंगरमाथ्यावर वाहन नेणे शक्मय नसल्याने आवाक्मयांत येणारी शक्मय होईल तेवढी मालमत्ता वाचवण्याचे प्रयत्न केल्याची माहिती नुकसानग्रस्त बागायतदार रमेश नाईक यांनी दिली.या लागलेल्या आगीमुळे स्थानिक बागायतदार यशवंत बांधकर,राजेश कोरखणकर,रमेश नाईक,शिवाजी हरी नाईक,आदी काजू बागायतदारांचे अंदाजे दीड-दोन लाखांचे नुकसान नुकसान झाले आहे.यापैकी रमेश नाईक यांचेच अंदाजे 50,हजारांचे नुकसान झाले असून आकस्मिक लागलेल्या आगीत बऱयापैकी मोहरलेल्या काजूंच्या झाडांचा अधिक भरणा आहे.ऐन काजू हंगामांत मोठय़ा प्रमाणांत नुकसानी सोसावी लागल्याने तोंडातला घास हिरावून नेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीकडून ही आग मुद्दाम लावण्यात लावण्याचा संशय यावेळी नुकसानग्रस्त बागायतदार रमेश नाईक यांनी बोलताना व्यक्त केला आहे.पेडणे अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी सुनिल देसाई,हवालदार जयराम शेटगांवकर,वाहनचालक विठ्ठल परब,दलाचे जवान प्रमोद गवंडी,प्रदीप आसोलकर,मनोज साळगांवकर,अविनाश नाईक,विशाल पाटील,लक्षदीप हळदणकर,यशवंत नाईक,विकास चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन आग कांही प्रमाणांत आटोक्मयांत आणण्याचे प्रयत्न केल्याचे अधिकारी सुनिल देसाई यांनी सांगितले