प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लसीकरणातील काटकसर, अतिरिक्त लसीचा प्रभावी वापर व शुन्य लस फुकट जाणे, या केरळमधील आदर्श नियोजनाचा अवलंब आता रत्नागिरीतही केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड या स्वतः यासाठी प्रयत्न करणार आहेत. केरळधील लसीकरण अंमलबजावणीची पंतप्रधानांनी मुक्तकंठाने स्तुती केल्यानंतर या बाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान डाव्यांचे राज्य असलेल्या केरळचे कौतुक करतात, हे सामान्य नाही. परंतु मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात राज्यातील आरोग्य कर्मचाऱयांचे त्यांनी कौतुक केले आहे. रत्नागिरी जिल्हय़ातही केरळप्रमाणे लसीकरणाचे काटेकोर नियोजन करण्यात येवून त्याचा लाभ लोकांना देण्यासाठी प्रशासनस्तरावरून पावले उचलण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठय़ा प्रमाणात लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी पुरवण्यात येणाऱया डोसमध्ये काही प्रकाणात जास्त लस असल्याचे आढळल्यानंतर केरळमधील आरोग्य विभागाने त्या लसीचाही उपयोग करण्याचे नियोजन केले. प्रत्येक ऍम्पुलमधील एकही थेंब फुकट न दवडता ती लस एकत्र करून त्यामधून वाढील लसीकरण करण्याचा अभिनव उपक्रम राबवला गेला. यामुळे उपलब्ध डोसपेक्षाही अधिक प्रमाणात लसीकरण दिसू लागले. याबद्दल माहिती घेतली असता उत्कृष्ठ नियोजन व सुयोग्य वापराचे हे उदाहरण पुढे आले होते. पंतप्रधानांनी या बाबत ट्विट केरून देशाचे लक्ष याकडे वेधले होते.
प्रत्यक्षात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणात 10 टक्के लस फुकट केल्यात सूट दिली आहे. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये त्याचा अपव्यय दर 8.83 टक्के तर लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक 9.67 आहे. बऱयाच राज्यात अशीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आहे. परंतु केरळने आश्चर्यकारक वाटणारी वेगळी आकडेवारी शासनाला सादर केली आहे. केरळला 7,33,88,006 लस डोस प्राप्त झाले होते. मात्र त्यातून 7,47,42,164 डोस देण्यात आले. म्हणजेच केरळने 8,78,788 अतिरिक्त लोकांना लस दिली. थोडीही लस व्यर्थ जाऊ दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे. रत्नागिरी जिल्हय़ात 4 मे पर्यंत शासनाकडून 1 लाख 90 हजाराहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाले. मात्र सध्या लस पुरवठय़ामध्ये व्यत्यय आला आहे.