फेसबुककडून 22 लाख रुपयांचे बक्षीस
वारणानगर / प्रतिनिधी
भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? आज इंटरनेट आपल्या सर्वांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग झाला आहे, परंतु हे धोकादायक सिद्ध होऊ शकते. जगाच्या कानाकोपऱयात गुन्हेगारी हॅकर्स बसले आहेत जे तुमची वैयक्तिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी मयूर फरताडेने (मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर) फेसबुक आणि इंस्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. त्याच्या या संशोधनाची दखल घेत फेसबुक ने त्याला 30 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठवला आहे.
फेसबुक 22 लाख रुपयांचे बक्षीस देणार
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप आणि ट्विटरसारख्या बऱयाच कंपन्या वापरकर्त्यांची सुरक्षा करण्यासाठी हॅकर्सपासून सतत त्यांच्या सिस्टीमचे रक्षण करतात, पण कुठेतरी ते चुकतही असतात. कंपनीच्या या चुकीमुळे वापरकर्त्यांना मोठÎा प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. फेसबुकच्या कंपनी इन्स्टाग्राममध्ये मयूर फरताडे या मुलाला असाच एक बग सापडला, यासाठी त्याला 22 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
इंस्टाग्राममध्ये मोठा दोष होता
इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खासगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि व्हिडीओज देखील बघता येत होते. त्याचबरोबर या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहिती बघता येत होती. विशेष म्हणजे, असे करण्यासाठी त्या यूजरला फालो करणे आवश्यक नव्हते. पोस्ट पण त्यांना विना फॉलो करता पाहू शकत होता. फेसबुक व इन्स्टाग्रामला सुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती.
21 वषीय मयूर फरताडेने चमत्कार केला
मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे.
या प्रकारच्या अभिनव आंतरराष्ट्रीय यशासाठी मयूरचे श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी अभिनंदन केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी कौतुक केले. मयूरला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, विभाग प्रमुख प्रा. ए. जी. पाटील, डॉ. गणेश व्ही. पाटील सर्व प्राध्यापक, रजिस्ट्रार व कर्मचाऱयांचे तसेच संगणक विभागाचे प्रमुख प्रमुख प्रा. ए. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
नवीन शिकण्याच्या छंदातून सापडला बग
लॉकडाऊनमध्ये पुरेसा मोकळा वेळ होता. काहीतरी नवीन शिकायचे म्हणून वेगवेगळÎा स्विक्मयुरीटी रिसोसेर्सेचचे लिखाण वाचत होतो. त्यातूनच मला इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फीचर्स बघून वेब ऍप आणि अँड्रॉइड ऍपवर टेस्ट करत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुकचा बग प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये सिक्मयुरिटी रिसर्चेस पार्टीसिपेट करू शकतात. ईथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला. –मयूर फरताडे