पाणीपुरवठा कंपनीच्या ढिसाळपणाचा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर येथील कोरे गल्ली आणि जेड गल्लीत मागील काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केली असता केवळ तात्पुरती मलमपट्टी करून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र परत चार -पाच दिवसांनी पुन्हा दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या या हलगर्जीपणाबद्दल रहिवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
एल ऍण्ड टी कंपनीच्या कर्मचाऱयांनी मागील आठवडय़ात काम बंद संप पुकारला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला होता. त्यातच शहापूर येथील काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
याबाबत एल ऍण्ड टी कंपनीकडे तक्रार केली असता. केवळ मलमपट्टी करून तात्पुरती दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे पुन्हा दूषित पाणी येत आहे. पाणीपुरवठा कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या संतप्त प्रक्रिया राहिवाशांतून व्यक्त होत आहेत. याकरिता व्यवस्थित दुरुस्ती करून नियमित पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे. आधीच बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.