वार्ताहर / कबनूर
कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून कोरोची गावची पन्नास वर्षांपूर्वीचीआठवण असलेली इंदिरानगर येथील पाण्याची टाकी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या परवानगीने ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी जमीनदोस्त केली. कोणतीही जीवित हानी झालेली नाही . अखेरीस आठवणीतील पाण्याची टाकी पाडल्यामुळे अनेक लोक हळहळ व्यक्त करीत होते.
कोरोची तालुका हातकणंगले येथील महा भागातील इचलकरंजी हातकणंगले मुख्य रस्त्यावरील इंदिरानगर येथील गेली पन्नास वर्षे उभी असलेली पाण्याची टाकी पडण्याच्या मार्गावर होती .या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट उभारून बुधवारचा आठवडी बाजार भरविला जातो. पाण्याची टाकीही सर्वांच्या नजरेत पत्ता सांगण्याचा सोयीस्कर मार्ग होता. सर्वांना परिचित होती. या ठिकाणी आठवडी बाजार भरत होते. टाकी कमकुवत होऊन त्याचे काही भाग पडत होते याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन कमकुवत झालेल्या पाण्याच्या टाकी मुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाण्याची टाकी पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद व हातकलंगले पंचायत समितीची पूर्व परवानगी घेण्यात आली.पाण्याची टाकी पाडण्याचे मक्तेदार नेमणूक केले. ही पाण्याची टाकी पाडण्याचे मक्तेदार मुक्ताई कंट्रक्शन यांनी मकता घेतला होता. त्यांनी गुरुवारी पाण्याची टाकी पाडण्यास सुरुवात केली व शुक्रवारी संपूर्ण पाण्याची टाकी जमीनदोस्त केली. सर्वांना आठवणीत राहील अशी पाण्याची टाकी पडल्याचे पाहून काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले. व जुन्या आठवणींना उजाळा देत पन्नास वर्षापूर्वी पासून ही पाण्याच्या टाकी बारा गाव पाणीपुरवठा योजनेतून उभी केली होती व गावाला पाणीपुरवठा केला जायचा पण जलस्वराज प्रकल्प गावात आल्यापासून 2009 पासून या टाकीतून पाणी पुरवठा बंद केला गेला.
ही पाण्याची टाकी पडल्याने काही वाटसरूंना आसरा तर काहींना निवारा देत होती. कोरोची गावची सुप्रसिद्ध ऍड्रेस प्रूफ आठवण असलेली पाण्याची टाकी आता आठवणीतच राहणार या वेळी सरपंच रेखा पाटील उपसरपंच लखन कांबळे ग्राम विकास अधिकारी राजू जाधव पोलीस पाटील सावकर हेगडे माजी उपसरपंच अभिनंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.