विनामास्क कारवाई करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणुचा प्रसार वाढूनये याकरिता सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख कमी होताच नागरिकांच्या तोंडावरचे मास्क देखील गायब झाले आहे. दिवाळी सणासाठी शहरात गर्दी असताना देखील मास्क घालण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या 15 दिवसात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण आटोक्मयात आले आहे. सध्या वातवरण उष्म असल्याने कोरोना रूग्णांचा आलेख कमी झाला आहे. बेळगाव जिल्हय़ात कोरोना रूग्णांचे प्रमाण 2 टक्क्मयावर आले आहे. पण कोरोनाची लागण होण्याची शक्मयता कमी झालेली नाही. कोरोनाची लागन कमी झाली, पण धोका टळलेला नाही. अशा स्थितीतही मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शहरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. लॉकडाऊन मागे घेण्यात आल्याने शहरासह परराज्यातील नागरिक देखील खरेदीसाठी बेळगाव शहरात येत आहे. पण मास्क घालण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मास्क घालने बंधनकारक असल्याचे सांगून अडीचशे रूपये दंड वसुल करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. पण कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभुमिवर विनामास्क कारवाई पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असल्याने बाजारपेठेत येणाऱया नागरिकांचे फावले आहे. बाजारपेठेतील व्यवसायिकांसह ग्राहक देखील विनामास्क फिरताना दिसत आहेत. सणाच्या खरेदीसाठी येणारे नागरिक विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्मयता आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. सध्या सगळीकडे कोरोनाचे रूग्ण सापडत असताना खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशातच महापलिकेने विनामास्क कारवाई करण्याकडे कानाडोळा केला असल्याने कोरोना रूग्णाचा आलेख पुन्हा वाढण्याचा धोका आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत: घ्यावी, असे आवाहन राज्य शासन आणि आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात येत आहे. पण आरोग्य खात्याच्या आवाहनाला शहरवासीयांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.