- 8 ते 16 मे पर्यंत निर्बंध कायम
ऑनलाईन टीम / तिरूवनंतपूरम :
केरळ सरकारने गुरुवारी (6 मे) राज्यात पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 8 मे पासून निर्बंध लादले जाणार आहेत. ते 16 मे पर्यंत कायम असतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली.
ते म्हणाले, केरळमध्ये मागील 24 तासात 42 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग वाढीचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.
या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वी कोरोना संख्या कमी व्हावी यासाठी राज्यातील यात्रा आणि अनावश्यक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरी देखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.