- एकूण 30 लाख 84 हजार 814 रुग्णांवर उपचार सुरू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या वर्षात पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांनी 3.79 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 3 लाख 79 हजार 257 नवे रुग्ण आढळून आले. तर 3,645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल मृतांचा आकडा 3,293 इतका होता. यामध्ये आज जवळपास 350 मृत्यूंची वाढ झाली आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी देशात 2 लाख 69 हजार 507 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 वर पोहचली असून, मृतांची संख्या 2 लाख 04 हजार 832 एवढी आहे. तर आतापर्यंत 15 कोटी 00 लाख 20 हजार 648 जणांना लस देण्यात आली आहेे.
- आतापर्यंत 1.50 कोटींपेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!
सध्या देशात 30 लाख 84 हजार 814 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.6% आहे. तर मृत्यू दर 1.13% इतका आहे.
आतापर्यंत देशात 28 कोटी 44 लाख 71 हजार 979 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 17 लाख 68 हजार 190 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 28 एप्रिल 2021) एका दिवसात करण्यात आल्या.