ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदरसिंह सरकारने शहरातील नाईट कर्फ्यूची वेळ वाढवण्यात आली आहे. आता रात्री 11 ऐवजी रात्रीच्या 9 वाजल्यापासून ते सकाळी 5 या वेळेत बाहेर पडण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी गुरुवारी दिली.
लुधियाना, पटियाला, मोहाली, जालंधर, कपूरथला, रोपड, अमृतसर, फिरोजपुर आणि फतेहगड साहिब मधील नाईट कर्फ्यूची वेळ वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या जिल्ह्यात आता नाईट कर्फ्यू असेल.
दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 35 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 6,172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सद्य स्थितीत 2039 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 283 जण ऑक्सीजन वर तर 27 जण व्हेंटिलेटर वर आहेत.