ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील 24 तासात देशात 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एका दिवसात 3293 जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे.
पाँडिचेरीमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन पाँडिचेरी सरकारने 3 मे पर्यंत कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व प्रकारच्या सभा, मंडळे बंद असणार आहेत.तसेच दारूची दुकाने आणि अन्य सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
दरम्यान, पाँडिचेरीमध्ये मागील 24 तासात 1,258 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 10 जणांचा मृत्यू झाला. तर कालच्या दिवसात 632 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 305 वर पोहोचली आहे. यातील 47,080 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 8,444 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.