भीती झटका, कणखर व्हा : डॉ. एम. डी. दीक्षित यांचे आवाहन
मनीषा सुभेदार / बेळगाव
स्वतःसाठी नक्हे तर तुमच्यामुळे दुसऱयाचे आरोग्य धोक्मयात येऊ नये, यासाठी मास्क वापरा. कोरोना पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यासाठी प्रथम त्याचे स्वरूप जाणून घ्या, आत्मविश्वास वाढवा आणि कोविड-19 च्या नियमांचे काटेकोर पालन करा, हा सल्ला दिला आहे ज्ये÷ व नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी.
बेळगावमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी त्याची भयावहता वाढते आहे. त्यानुरूप लोकांमध्ये भीती, धास्ती, अस्वस्थतासुद्धा वाढते आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एका टास्कफोर्स समितीची नितांत गरज आहे. या समितीची गरज नियमांचे पालन आणि आपले आकलन वाढविणे, या निकषांवर बेळगावमधील कोरोनाचा फैलाव रोखता येईल, यावर डॉ. दीक्षित ठाम आहेत. या अनुषंगाने त्यांची भेट घेऊन चर्चा करता त्यांनी उपरोक्त सल्ला दिला.
: कोविडबद्दल काय सांगाल?
कोविड-19 हा एक विषाणू आहे. त्याच्या चरबीयुक्त बाहय़ आवरणाला 74 काटे आहेत. त्याचा सर्वाधिक प्रभाव हा नाकावर होतो. त्याबरोबरच डोळे आणि तोंड या अवयवांवरही होऊ शकतो. मात्र, हा विषाणू नाकात शिरल्यास 24 ते 48 तास तो तेथे तसाच राहतो. म्हणजेच त्याचा प्रभाव या कालावधीत तो पाडू शकत नाही. याच कालावधीत आपण सतत नाक स्वच्छ केले तर हा विषाणू बाहेर जावू शकतो. आणि कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकतो. दिवसातून किमान दोनवेळा नाक स्वच्छ करणे आवश्यक आहे.
:पूर्वीच्या-आताच्या लक्षणांमध्ये काही फरक आहेत का?
कोविडमध्ये ताप येणे, घसा दुखणे आणि दम लागणे ही मुख्य लक्षणे आहेत. 85 टक्के लोकांना कोरोना झाला तरी ते पूर्णतः बरे होऊ शकतात. पाच ते आठ टक्के गंभीर होऊ शकतात आणि 3 ते 5 टक्के इतकेच कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. ताप हे त्याचे मुख्य लक्षण आहे. पूर्वी सर्दी झाल्यास भीती निर्माण होत होती. पण अलीकडच्या काळात भारतात सर्दी झाली असेल तर कोविड नाही, असे संशोधन पुढे आले आहे. जर नाक गळत असेल तर तो कोविड नाही हे आता समजून घ्यायला हवे. ताप, घसा दुखी आणि दम लागणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत.
:विषाणू शरीरात किंवा नाकात गेल्यास किती काळात प्रभावी होतो?
नाकात विषाणू शिरल्यास 24 ते 48 तासांत तो कार्यरत होत नाही. यावेळी आपण जलनेती करू शकतो. आयुर्वेदामध्ये ही पद्धत नमूद केलेली आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टर त्याचा सल्लाही देतात. इथे कोणती पॅथी हे महत्त्वाचे नाही तर जलनेती कोविडमध्ये फार प्रभावी ठरू शकते, हे पाहायला हवे. कोविडची लागण होण्यासाठी 1 हजार विषाणू आवश्यक ठरतात. जर जलनेती केल्यास हा धोका कमी होतो. मुख्य म्हणजे जर एक हजारपेक्षा कमी विषाणू नाकात असतील तर आपले शरीर ऍन्टीबॉडीज म्हणजेच प्रतिजैवक तयार करू शकते आणि हा विषाणू बाहेर काढू शकतो.
:सतत हात धुण्याची आवश्यकता किती व कशासाठी?
कोरोना विषाणूभोवती एक चरबीयुक्त आवरण आहे. त्याला 74 काटे आहेत. साबणाने हात धुतल्यास हे चरबीयुक्त आवरण निष्क्रिय होते. म्हणून सतत हात धुण्याची गरज आहे. मात्र साबण किंवा सॅनिटायझरचा वापर त्यासाठीच महत्त्वाचा आहे. जितके जास्त हात धुतले जातील तितका संसर्गाचा धोका कमी होईल.
:मास्क, सामाजिक अंतर या नियमांची गरज किती आहे?
जर कोविडग्रस्त व्यक्ती दुसऱया व्यक्तीच्या संपर्कात 15 ते 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ राहिली तर त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्मयता असते. दोन व्यक्तींपैकी एक पॉझिटिव्ह आहे व दुसरी निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह व्यक्तीने मास्क घातला नाही तर त्या व्यक्तीमुळे 4 ते 5 जणांना संसर्ग होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मास्क हवा. कोविड आहे का नाही, हे कोणाला माहिती असते किंवा नसते. म्हणून प्रत्येकानेच केवळ स्वतःसाठी नव्हे तर दुसऱयांच्या आरोग्याच्या काळजीसाठी मास्क आवश्यक आहे.
: विषाणूंचा फैलाव होण्याची टक्केवारी कशी आहे?
मास्क घातला नाही तर 20 ते 30 टक्के विषाणू बाहेर पडतात. बोलण्याने 200 ते 300 विषाणू बाहेर पडतात तर शिंकणे किंवा खोकणे यामुळे दोन कोटी विषाणू बाहेर पडतात. कोरोना संसर्गासाठी 1 हजार विषाणू पुरेसे ठरतात. म्हणून मास्क वापरणे आवश्यक आहे. किंबहुना तो नियम झाला पाहिजे. जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांच्याशी कोणताही व्यवहार करणे तर दूरच, बोलणेसुद्धा टाळले पाहिजे.
:होम क्वारंटाईन म्हणजे घरगुती विलगीकरण कसे असावे?
या प्रश्नावर डॉक्टर म्हणाले, पूर्वी सरकारने होम क्वारंटाईनसाठी परवानगी दिली होती. आता मात्र होम क्वारंटाईन प्रोग्रॅम पुढे आला आहे. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी द्यावा. जे गंभीर आहेत त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये ठेवावे. जे घरी आहेत त्यांचा श्वासोच्छवास, रक्तदाब, प्राणवायूचे प्रमाण यांची मात्र सरकारी आरोग्य सेवकांतर्फे तपासणी करून नोंद केली पाहिजे. लक्षणे आढळणाऱया सर्वांनाच कोरोना वॉर्डमध्ये ठेवण्याची गरज नाही. असे केल्याने हॉस्पिटलवर ताण पडणार नाही.
:कोविड रुग्णांवर उपचार केल्यास कोविड होतो का?
आपण कोविड रुग्णांवर उपचार केले की आपल्याला कोविड होतो, प्रामुख्याने आरोग्य सेवकांना असे सतत वाटते. परंतु चीन, अमेरिका, इंग्लंड यांनी काही नियमावली केली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखता आला आहे. बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये 60 हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी काम करतात. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोना झालेला नाही.
याचे कारण असे की हॉस्पिटलमध्ये येणाऱया प्रत्येकाचे स्क्रिनिंग केले जाते. मास्क तपासला जातो. कोणती लक्षणे आहेत का? हे पाहिले जाते. त्याचे अंडर टेकिंग घेतले जाते. ही माहिती ऍपमध्ये फिड केली जाते. त्यानंतर हिरवा दिवा लागला तरच त्या व्यक्तीला आत प्रवेश दिला जातो. आपल्याकडे सर्दी, खोकला, ताप असला तरीही लोकांना नोकरीवर जावे लागते, हे चूक आहे. अशा लोकांनी घरी राहणे महत्त्वाचे आहे.
:खासगी हॉस्पिटल्सचे दर आणि सरकारी हॉस्पिटल्समधील व्यवस्था यामुळे रुग्णांची कोंडी होते, यावर काय सांगाल?
सरकारी हॉस्पिटल्सना जनतेकडून मदत मिळाली पाहिजे. लोकांनी ठराविक निधी कोटीच्या स्वरुपात या हॉस्पिटल्सला दिला पाहिजे. त्यातून हॉस्पिटल्स अत्यावश्यक खरेदी करू शकते. सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी जनतेची सुद्धा जबाबदारी आहे. टीका, चर्चा आणि उपदेश करण्याऐवजी जनतेने सध्याच्या कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीत निधी उभा करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू व्हायला हवे.
:अधिकारी आणि डॉक्टर यांच्यात समन्वय कसा साधला जाईल?
अधिकारी, डॉक्टर्स यांची एक टास्कफोर्स समिती स्थापन केली पाहिजे. हे डॉक्टर अधिकाऱयांना मार्गदर्शन करू शकतील. योग्य सल्ला देऊ शकतील. त्यामुळे समन्वय साधला जाईल. बेळगावमध्ये संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. काही प्रथितयश एकत्र व क्षमता असणाऱया लोकांनी समाजाच्या भल्यासाठी आता पुढे यायला हवे. यासाठी व्यक्तीशःसुद्धा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत.
…हे नियम पाळण्याची गरज
आजपासून श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्ये, नेमधर्म पाळण्याचा मास. यंदा सामूहिकरीत्या मंदिरांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी श्रावण मासाचे कोणतेही व्रतवैकल्य करण्यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोना-सध्याची परिस्थिती पाहता यंदाच्या श्रावण मासामध्ये ‘मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, विलगीकरणात असणाऱयांना बहिष्कृत न करणे आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ढळू न देणे’ हे नियम पाळण्याची गरज आहे.
घाबरून जाणे प्रथम बंद करायला हवे
कोरोनामुळे घाबरून जाणे प्रथम बंद करायला हवे. जितके आपण घाबरू तितका आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करणे, नकारार्थी विचारांना दूर सारणे महत्त्वाचे ठरणार आहे.