- बिहारमधील 111 डॉक्टरांचा समावेश
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात समोर आलेले अनेक आकडे धक्कादायक आहेत. अनेक राज्यात रुग्णांना बेड मिळत नव्हते, त्यातच लसींचा तुटवडा जाणवत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती काही प्रमाणात सुधारता दिसत आहे.
मात्र, त्यातच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने एक धक्कादायक आकडा जारी करण्यात आला आहे. IMA च्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत कमीत कमी 719 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू हे बिहार येथे झाले आहेत. त्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा नंबर लागतो.
आयएमएने राज्यानुसार जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारी नुसार बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजेच 111 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ही संख्या 109 तर उत्तर प्रदेशात 79 इतकी आहे.
तर मागील वर्षी या महामारीत जवळपास 1,300डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. दुसऱ्या लाटेत हा आकडा 646 इतका आहे. दुसऱ्या लाटेत आंध्र प्रदेशात 35 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. आसाम 8, छत्तीसगड 05, गुजरात 37, गोवा 02 तर हरियाणा 03, जम्मू काश्मीर 3, झारखंड 39, कर्नाटक 9, केरळ 24, मध्य प्रदेश 16, राजस्थान 43, मणिपूर 5, वेस्ट बंगाल 30, ओडिशा 28, पंजाब 3, पाँडिचेरी 1, तामिळनाडू 32, तेलंगणा 36, त्रिपुरा 2, उत्तराखंड 2, वेस्ट बंगाल 63, अन्य 1 आणि महाराष्ट्रातील 23 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान देशात आतापर्यंत 2,93,59,155 रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 2,79,11,384 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य स्थितीत 10 लाख 80 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.