त्या रुग्णाच्या प्रश्नावर अशा गंभीर प्रसंगी काय उत्तर द्यावे हे डॉक्टर व नर्स या दोघांनाही सुचेना. आजपर्यंत इतक्मया विश्वासाने आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत मृत्यूशय्येवर असलेल्या हजारो रुग्णांना त्याने जीवनदान दिले होते. पण याप्रसंगी त्यांना नमते घ्यावे लागले. कारण मृत्यू समोर दिसत असताना व्यक्ती कोणत्या कठीण प्रसंगातून जाते व त्यांची सारी भिस्त असते ती प्रगतशील विज्ञानावर आणि कोरोनाच्यानिमित्ताने ही श्रद्धा ढासळली. आता वैज्ञानिक म्हणतील की, अजून आम्ही हार मानलेली नाही. कोरोनावर लस लवकरच येईल व पुन्हा सर्व काही ठीक होईल. पण असा विचार करणे म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे या म्हणीप्रमाणे आहे. कारण इतिहास सांगतो की, कोरोनासारखे आतापर्यंत 10 महामारीचे प्रसंग आले. त्यामुळे करोडो लोक मृत्यूमुखी पडले. नंतर त्यावर वैज्ञानिकांनी लसही शोधून काढली. औषधेही शोधून काढली. यामुळे थोडे जास्त दिवस जगणे कदाचित शक्मय झाले असेल पण आजही मृत्यूचे प्रमाण शंभर टक्के आहे. कधी कधी गंभीर आजारातून बाहेर आल्यावर मृत्यूवर मात करून मृत्युंजय झाला म्हणून त्या व्यक्तीचा गौरव होतो. त्याला वाचवणाऱया वैद्यांचा/डॉक्टरांचा ‘मानवी देहातला देव’ म्हणून गौरवही होतो. पण आजपर्यंत कोणीही मृत्यूवर विजय प्राप्त करू शकलेला नाही. म्हणून आपण विज्ञान काहीही करू शकते असे जे समजतो ही एक ‘अंधश्रद्धा’ आहे. कोरोनाच्या निमित्ताने याचा अनुभव सर्व जगभरातले लोक घेत आहेत. दुर्दैवाने लोक आता ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या भावनेने नेहमीच्या व्यवहारात मग्न होताना दिसत आहेत. पण माझे मन मात्र जीवनाच्या गंभीर समस्येवर ज्या प्रत्येकाच्या जीवनात 100 टक्के येणार आहेत, त्यावर विचार करत आहे आणि या समस्यांवर आजपर्यंत विज्ञानाकडे कोणताही उपाय नाही. या समस्या सोडवण्याचे आव्हान कोरोनाच्या निमित्ताने प्रगत विज्ञानासमोर आहे व यावर वैज्ञानिकांनी, बुद्धिवंतांनी जगाच्या कल्याणासाठी विचार करावा हे आवाहनही या निमित्ताने करावेसे वाटते. या गंभीर समस्या कोणत्या आहेत. यावर थोडा विचार करू.
विज्ञानाने निश्चितच आपल्याला अनेक सुखसोयी दिल्या आहेत पण त्यामुळे एक प्रकारचा अति आत्मविश्वास आपल्यात आला आहे व जीवनातल्या गंभीर समस्या ज्या 100 टक्के आपल्याला सामोऱया जाव्या लागतात त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आपण थोडे ‘उघडा डोळे-बघा नीट’ याप्रमाणे पाहिल्यास कोणाही सामान्य व्यक्तीला सुद्धा पुढील सात समस्या अनुभवास येतील.
1. निसर्गापासून होणारे त्रास- या जगामध्ये भूकंप, चक्रीवादळे, दुष्काळ, अतिवृष्टी, महामारी, त्सुनामी यासारखी संकटे येतात. आधुनिक विज्ञान आपल्याला या सर्व संकटापासून सावध करू शकते, पण ही संकटे थांबवू शकत नाही व त्यापासून होणारे सर्व प्रकारचे वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक परिणाम टाळू शकत नाही.
2. इतर जीवांपासून होणारे त्रास : साध्या मुंगीपासून मच्छर, ढेकूण, साप, विंचू सारखे इतर प्राणी व आपण निर्माण केलेले शत्रू याचा त्रास नेहमीच आपणाला होत असतो. उदाहरणार्थ एक क्षुल्लक मच्छर चावला तर कितीही सुदृढ व्यक्ती विचलित होतो व मलेरियासारख्या रोगाने त्याला मृत्यूही येऊ शकतो.
3. आपले मन व शरीरापासून होणारे त्रास : या जगात आपल्याला मानसिक त्रास नाही असे छातीठोकपणे कोण सांगू शकतो? कोण असा विचार करत असेल तर तो अज्ञानामध्ये आहे, असे समजावे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 4 पैकी 1 म्हणजे 450 मिलियन (45 कोटी) लोक मानसिक रुग्ण आहेत आणि ही संख्या वर्षानुवर्षे वाढते आहे. मानसिक तणावामुळे अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती ज्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत त्या आत्महत्या करताना आपण दररोज बातम्यामधून बघत असतो. यातून कोणीही मुक्त नाही. सध्या सुशांतसिंह राजपूतचे प्रकरण ताजे आहे. काही वर्षापूर्वी अनेक फिल्मस्टार्स, व्यावसायिक, डॉक्टर, वैज्ञानिक अगदी अलीकडच्या काळात लोकांना शांतीचा, समृद्धीचा मार्ग शिकविणारे तथाकथित आध्यात्मिक गुरुसुद्धा यांनी मनोग्रस्त अवस्थेत आत्महत्या केल्याचे आपण वाचले असेल. या तर सर्व सुखामध्ये लोळत असलेल्या व्यक्ती आहेत, मग कमी शिकलेल्या अज्ञानी शेतकऱयांची व्यथा काय सांगावी? सारांशाने मन आणि शरीरापासून होणाऱया त्रासापासून कोणीही मुक्त नाही.
4. जन्मताना होणारे त्रास : प्रत्येक जण जन्माला यायच्या अगोदर गर्भामध्ये 9 महिने अतिशय कठीण प्रसंग अनुभवत असतो. आपल्या आजूबाजूला रक्त, मांस, हाडे, पेशी मलमूत्राशी संग करत काळोखामध्ये आपले डोके दोन्ही गुडघ्यामध्ये घालून असहाय्य अवस्थेत आईने जे खाल्ले ते अंशरूपाने खाऊन दु:ख सहन करत असतो. आई वडील, मित्रमंडळी, नातेवाईक आपल्याला मुलगा/मुलगी होणार या आनंदात असतात. पण आपण मात्र हा त्रास सहन करत असतो. वैद्यकीय सुधारणेमुळे बाळाची ही अवस्था आपण सोनोग्राफीने पाहू शकतो. पण होणारे दु:ख दूर करू शकत नाही. आपण वर वर्णन केलेल्या अवस्थेमध्ये 9 मिनिटेसुद्धा बसू शकणार नाही, पण दुर्दैवाने हॅपी बर्थ डे म्हटले की आपण ही दु:खे विसरून जातो.
5. आजारपण : आपण आपल्या शरीराची कितीही काळजी घेतली तरी आजारपण कुणाला सोडत नाही, अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर व सध्या जोरात चालत असलेल्या कोरोना महामारीचा अनुभव आपल्याला आहे. योगसाधनेने, वैद्यकीय मदतीने आपण काही आजारांवर मात करू शकतो. काही थोडी वर्षे पुढे ढकलू शकतो, पण पूर्णपणे मात करण्यात आपण यशस्वी होऊ शकत नाही.
6. म्हातारपण : आपण आजूबाजूला वृद्ध व्यक्ती व त्यांना होणारा त्रास पहात असतो. या अवस्थेत त्रास भोगत असलेल्या त्या व्यक्तीला व त्यांची काळजी घेणाऱया व्यक्तीला ‘देवा एकदाचे सोडव रे बाबा या दु:खातून’ अशी काकुळतेने केलेली प्रार्थना आपण अनुभवली आहे. बाहेरून वृद्ध दिसू नये म्हणून विज्ञानाने अनेक शोध लावले पण ही स्वत:ची व इतरांची फसवणूक आहे. वृद्धावस्थेकडे आपले जाणे कोणीही रोखू शकत नाही. हे सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल.
7. मृत्यू : हा शब्द ऐकणे कोणालाही आवडत नाही. मृत्यूच्या वेळी सर्व काही सोडून जाणे, याच्या वेदना असहय़ असतात. बाहेरून डॉक्टर, नर्स, नातेवाईक, मित्रमंडळी, जमवलेला पैसा, प्रति÷ा, प्रयत्नांची पराका÷ा करतात पण शरीरातल्या भोगाव्या लागणाऱया असहय़ वेदना कोणीही थांबवू शकत नाही, असे सांगतात की, मृत्यूच्या वेळी 40 हजार विषारी विंचू एकाच वेळी चावत असल्याच्या वेदना होतात.
विज्ञान कितीही प्रगत झाले तरी वर वर्णन केलेल्या सात दु:खापासून आपल्याला सोडवू शकत नाही हे मान्य करावेच लागेल. कोरोनाच्या निमित्ताने आपली असहाय्यता, हतबलता नम्रपणे स्वीकारणे व निसर्गावर आपण मात करू शकतो. या भ्रमात न राहता निसर्गाला शरण जाणे व निसर्गाचे नियम समजून घेणे हे विज्ञानाला आव्हान व आवाहन आहे.
वैज्ञानिकांना जमणार नाही ते विज्ञान 400 वर्षापूर्वीच या जगाच्या कल्याणासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या विज्ञानाचा सर्वसामान्यांनी, बुद्धिवंतांनी, वैज्ञानिकांनी अभ्यास करावा हेच नम्र आवाहन.
वेंकटेश पतकी , थेट अमेरिकेतून – भाग 2