वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील काळात बस व टॅक्सी क्षेत्रात सुमारे 20 लाख लोकांनी नोकरीच्या संधी गमावल्याची माहिती बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय) ने दिली आहे.
सदर संस्थेअंतर्गत 20 हजार ऑपरेटर्स कार्यरत असून 15 लाख बसेस, मॅक्सीकॅब आणि 11 लाख पर्यटक टॅक्सी यांच्यामार्फत सुमारे 1 कोटी लोकांना थेट नोकरी मिळते. कर्ज घेतलेल्या खासगी ऑपरेटर्सना करात व कर्जावरील व्याजावर सवलत देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांना व्यवसाय बंद करण्यावाचून गत्यंतर नसतं. सध्याला या सर्व व्यवसायांवर बेकारी उदभवली आहे. लॉकडाऊनच्या काळात सुमारे 95 टक्के वाहने रस्त्यावर उतरलेली नव्हती. व्यवसाय नसल्याने कामगारांना पगार कुठून द्यायचा हा प्रश्न कंपन्यांना पडला आहे.
1 कोटी पैकी 30 ते 40 लाख जण नोकरी गमावतील तर 10 ते 20 लाख जणांनी नोकरी गमावली असल्याचे संघाने म्हटले आहे.