ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिटेन्शन पॉलिसीअंतर्गत पुढील वर्गात प्रमोट करण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांना सेमी ऑनलाईन क्लासेसमध्ये काय शिकवण्यात आले, हे देखील समजणे गरजेचे असून त्या आधारावर आम्हाला पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करता येईल. त्यामुळेच आम्ही या वर्षी आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात केलेल्या वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रातही घ्यावा अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे.