ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या अर्थमंत्रालयाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता आर्थिक परताव्याची मुदत वाढविण्यात आली असून, उशिरा परतावा भरणाऱयांकडून 12 ऐवजी 9 टक्के दंड वसूल केला जाणार आहेत. दरम्यान, ही मुदत आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर मार्च एप्रिल व मे महिन्याचा जीएसटी भरण्याचीही मुदतही जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज याबाबत घोषणा केली.
कोरानाची झळ अवघ्या जगाला बसली असून, अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झालेला आहे. भारतातील अनेक राज्यांतही लॉकडाऊन करण्यात आले असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच आधार पॅन लिंक करण्याची मुदतसु 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
शेअर बाजार सावरला
दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअरबाजार सावरला. काल शेअर बाजारात भूकंप झाला होता. मात्र, या घोषणेनंतर तो 1100 अंकांनी सावरला.