प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने शहरात घर टू घर सर्व्हे करून नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकतेच हा सर्व्हे पूर्ण झाला असून, 30 हजारांपैकी 27 हजार 500 कुटुंबांचा नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये मुंबई, पुण्याहून 1 हजार 757 नागरिक साताऱयात आल्याची माहिती समोर आली आहे.
सातारा नगरपालिकेने दि. 22 मार्च पासून शहरात घर टु घर सर्व्हेचे काम हाती घेतले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने 14 कर्मचाऱयांचे एक अशी 22 पथके तयार केली होती. या पथकात पालिकेने कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकाऱयांचा समावेश होता. या पथकांनी रोज नऊ ते दहा तास काम करून 27 हजार 500 कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण केला. यामध्ये केवळ पुणे-मुंबई येथून आलेल्यांची नोंद नव्हती तर प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखासह, सदस्यांचा तपशील त्यांची वैद्यकीय माहिती, नजीकच्या काळात झालेल्या प्रवास, चालू असलेले उपचार त्याचा तपशील आदी नेंदी प्रामुख्याने घेण्यात आल्या.
पुणे, मुंबई येथून आप्तस्वकीयांची शहरात गर्दी वाढली असल्याचे या सर्व्हेतून समोर आले. सातारा पालिकेने या सर्व नोंदी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. कोरोनाचा संगर्स रोखण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता, धूर व औषध सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.