ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या महामारीचा संसर्ग वाढू नये यासाठी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यातच आता भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती ट्विट द्वारे दिली आहे.
मुंबईत दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथक खूप मेहनत घेतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राम कदम यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे.