मुंबईसाठी मोजावे लागताहेत हजार रुपये
प्रतिनिधी/ सातारा
पुणे, मुंबईहून येणाऱयाच्यामुळे कोरोना वाढतो या समजामुळे सातारा जिह्यातील 11ही आगारातून पुण्या,मुंबइं&कडे जाणाऱया फेऱयांची संख्या कमी केलेली आहे. त्यामुळे पुण्यामुंबईकडे जाणारे व पुण्यामुंबईकडून येणाऱयांची संख्या ही कमी झालेली नाही तर तेवढीच असून प्रवाशांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. तब्बल मुंबईसाठी हजार रुपये तर पुण्यासाठी अडीचशे रुपये मोजावे लागत आहेत. खाजगी वाहतूक जोमात सुरु आहेत. त्यातच कोरोनाची भितीमुळे प्रवासी येत नाहीत, असे कारण सांगून वाटेल ते पैसे खाजगी वाहनधारक सांगत आहेत, असे चित्र सध्या दिसत आहेत.
सातारा बसस्थानक व जिह्यातील इतर दहा आगारात मुंबईकडे जाणाऱया बसेसच्या फेऱया कमी करण्यात आल्या आहेत. फेऱया कमी करण्याचे कारण पुणे, मुंबईसह साताऱयात वाढत चाललेल्या कोरोना बाधिताचा आकडा हा सांगितला जात आहे. साताऱयातल्या बसस्थानकातून मुंबईकडे जाणाऱया विनावाहक विना सेवाच्या अनेक फेऱया रद्द केल्या आहेत. बसेसच्या फेऱया रद्द केल्या तरीही प्रवाशांची संख्या कमी झाली नाही. प्रवाशी मात्र तेवढे आणि त्याच प्रमाणात येजा करताना दिसत आहेत. अगोदरच अनेकाचे रोज्गार गेल्याने दोन वेळच्या भाकरीसाठी अनेक सातारकर मुंबई, पुण्यात आहेत. तर आठवडा, पंधरा दिवसाला ते जा करतात. त्यातही कोरोनाचा नियम नाही कधीही चिटकेल. गावाकडे असलेल्या आईवडिलांची काळजी लागलेली असते. त्यामुळे मुंबई, पुण्यावरुन गावी येणे जाणे सुरु असते. वाटेल ती किंमत मोजून काही प्रवाशी येजा करत आहेत. त्यात बसेसची संख्या कमी असल्यामुळे सातारा शहरातील मुख्य बसस्थानकाच्या बाहेर खाजगी बसेसचे एंजट उभे असतात. त्या बसेस सांयकाळी पारंगे चौकात असतात. त्यांच्याकडून प्रवाशांकडे मनमानेल एवढा तिकीट दर सांगितला जातो. अगदी मुंबईची तिकीट पाचशे रुपये आहे तेथे हे एक हजार एवढी सांगतात तर पुण्याची तिकीट ही 130 रुपये असून अडीचशे रुपये मोजावे लागत आहेत.