दिवसभरात 6 बळी, 229 बाधित
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनामुळे गुरूवारी 9 जणांचे बळी गेले असून 229 बाधित सापडले आहेत. त्याचबरोबर 258 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सध्या 2727 सक्रीय रुग्ण आहेत.
गुरूवारी 3596 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 229 बाधित सापडले. त्यापैकी 35 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 194 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. त्याचबरोबर 30 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 165426 वर पोहोचली आाहे तर एकूण 159677 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बळीसंख्या 3022 वर पोहोचली आहे.
गुरूवारी नोंद झालेल्या 9 बळींमध्ये 6 जण गोमेकॉत, तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तिघांचा समावेश आहे. या मृतांमध्ये सर्वजण 47 ते 80 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 8 पुरुष व 1 महिला रुग्णाचा समावेश आहे.
दुसऱया डोससाठी आजपासून मोहीम
कोविडचा दुसरा डोस घेण्यास पात्र लोकांना आज शुक्रवार 25 जूनपासून लस देण्यात येणार आहे. यावेळी ओळखपत्र किंवा अन्य प्रमाणपत्र नसलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील इम्युनायझेशन अधिकाऱयाने दिली आहे. आतापर्यंत 57 टक्के गोमंतकीय तसेच 80 टक्के आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी कोविडचा पहिला डोस तर 15 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.
16 जानेवारीपासून देशात कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली होती. त्याद्वारे आतापर्यंत 57 टक्के लोकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता ’टीका उत्सव-3’ प्रारंभ केला आहे. हा राज्य सरकारचा उपक्रम आहे. त्यासाठी 40 कायमस्वरुपी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याशिवाय पंचायत तसेच पालिका परिसरात लोकांचे लसीकरण करण्यासाठी 198 ’सेटलाईट सेंटर्स’ कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या रोज सुमारे 15 हजार लोकांचे लसीकरण करणे शक्य होत आहे. ही गती अशीच राहिल्यास 31 जुलै पर्यंत 100 टक्के लोकांचे निदान पहिल्या डोसपर्यंतचे तरी लसीकरण पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नाही दरम्यान, दुसऱया डोससाठी आजपासून मोहीम प्रारंभ होत आहे. यावेळी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर ओळखपत्र नसलेल्या तसेच गोव्यात वास्तव्यास असलेले साधू, संत, कैदी, भिकारी, यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरात मोठय़ा प्रमाणात असलेल्या नेपाळी नागरिकांसाठी सरकारने लसीकरणाची खास व्यवस्था केली आहे, अशी माहिती सदर अधिकाऱयाने दिली.