सातारकरांना अधिक काळजी घेणे गरजेचे
प्रतिनिधी/ सातारा
पावसाळा संपून आता कोरोनात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेपासून धुक्यांची चादर सर्वत्र पसरत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. यांचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे अधिक काळजी करत घरगुती उपाय करण्यावर भर दिला जात आहे.
मार्च महिन्यात जिह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्वत्र धास्ती निर्माण झाली. यांचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाले. ऐन कडक उन्हाळा सातारकरांनी घरात बसून काढला. तोच जून महिन्याच्या सुरूवातीला अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना नियम शिथील करण्यात आले. यांचा फायदा घेत नागरिक सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लघंन करू लागले. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत गेला आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले. पेंशटची वाढती संख्या आणि बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले. पावसाळयात सर्दी, खोकला, ताप अशा साथीच्या आजारात नेहमीच वाढ होत असते. मात्र कोरोनाची हीच लक्षणे असल्याने घरा-घरात काळजीचे सावट निर्माण झाले. या काळजीत कामानिमित्त घराबाहेर पडण्यावर सातारकरांनी भर दिला.
आता पावसाळा संपूर्ण कोरोनात गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. पहाटेपासून धुक्याची चादर सर्वत्र पसरत आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. वातावरणात गारवा निर्माण होवून अंगदुखी, कणकणी येवून ताप येईल का ? अशी भीती वाटत आहे. उबदार कपडे घालण्यावर भर दिला जात आहे. तसेच सकाळच्या वेळेत चहा, काढा अशा गरम गरम पदार्थाचे सेवन करण्यात येत आहेत. तरूण वर्ग फिटनेसवर विशेष लक्ष देत आहे. तर जेष्ठ घरातच योग, प्राणायम करत आहेत. यांचे अनुकरण लहान मुले करत आहेत. मनातून कोरोनाची धास्ती कमी करत बदलत्या ऋतुप्रमाणे उपाय योजना करण्यात येत आहेत.