प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाने आणखी 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामुळे मृतांचा एकूण संख्या 2 हजार 101 इतकी झाली आह़े तर सोमवाऱी नव्याने 151 रूग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 86 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 65 रूग्ण मिळून आले आह़े रूग्णसंख्या मंदावली असली तरी निर्बंध असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आलेला नाह़ी
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या सोमवारी आरटीपीसीआरच्या 4 हजार 218 चाचण्यांपैकी 86 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 713 पैकी 65 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड-9, दापोली-31, खेड-11, गुहागर-16, चिपळूण-16, संगमेश्वर-10, रत्नागिरी-34, लांजा-7 तर राजापूर-17 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 71 हजार 876 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.03 इतका आह़े
मृतांमध्ये चिपळूण-2, रत्नागिरी-10, लांजा-2, राजापूर-1 अशी 15 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े एकूण मृतांची संख्या 2 हजार 101 इतकी आह़े मृत्यूदर 2.92 इतका नोंदवण्यात आला आह़े आतापर्यंत झालेल्या मृतांमध्ये मंडणगड-31, दापोली-180, खेड-184, गुहागर-154, चिपळूण-399, संगमेश्वर-183, रत्नागिरी-719, लांजा-112, राजापूर-139 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े
तर बरे झालेल्या 158 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 67 हजार 470 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 93.87 इतके आह़े तर 2 हजार 139 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 425 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़