संकट’टळू दे…अन् ‘वारी’ होऊ दे ! हीच भावना : निर्बंध लादणाऱया सरकारचा निषेध : गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील यांनी मांडली व्यथा
प्रसाद सु.प्रभू /बेळगाव
‘संकट’ टळू दे…अन् ‘वारी’ होऊ दे! या एकाच भावनेतून विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी संप्रदाय आतुर झाला आहे. पंढरपुरात संचारबंदी, वारीच्या मार्गावर कडक बंदोबस्त आणि वारी करणारच असे म्हणणाऱया बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या वारकऱयांना अटक अशा घटना वारकऱयांच्या मनात संताप वाढवू लागल्या आहेत. आपल्या लाडक्मया देवाची भेट घेऊन आनंदाश्रूंना वाट मिळतोवर क्षणोक्षणी दुःखाश्रू वाहताहेत आणि बंदी घालणाऱया सरकारचा हे वारकरी निषेधच करू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर बेळगाव वारकरी महासंघाचे अध्यक्ष गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील यांनी समस्त वारकरी संप्रदायाची व्यथा तरुण भारतकडे मांडली. बेळगाव शहर, बेळगाव आणि खानापूर तालुका तसेच चंदगड तालुक्मयासह महाराष्ट्रातील काही भाग मिळून वारकरी महासंघाचे काम चालते. दरवषी सुमारे 800 वारकऱयांना घेऊन दिंडीने पंढरीची पायी वारी हा संघ काढतो.
कोरोनामुळे मागील वषी बंदी आली. यंदाही वारीची परंपरा खंडित झाल्याने हिरमोड झाला आहे. एकीकडे राजकीय प्रचार आणि नेत्यांचे वाढदिवस हजारोंच्या उपस्थितीत होतात, आणि आम्ही सर्व नियम पाळून वारी करतो अशी विनंती करूनही परवानगी दिली जात नाही ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.
बेळगावच्या नामदेव दैवकी मंदिरात जमून महासंघाने महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून निषेधही नोंदविला. यावेळी वेगवेगळय़ा भागातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. आध्यात्मिकतेची प्रतिज्ञा घेऊन भागवत धर्माची पताका उंचावलेल्या वारकऱयांवर पोलीस दादागिरी करीत आहेत. बंडातात्यांना अटक झाली, युवकांना शिवभक्ती आणि व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविणाऱया संभाजीराव भिडे गुरुजींवर खटले दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत आहे. हे पूर्णपणे निषेधार्ह असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कोरोनाचे कारण देत जनतेची पिळवणूक होत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. विठूभक्तीने आम्ही आसुसलेलो आहोत. यामुळे आता पारायणातून विठ्ठलाचा जागर गावोगावी सुरू आहे. वारीच्या आठवणीने मन भारावून जात आहे, असे त्यांनी सांगितले.
बंदी उठल्यानंतर पंढरपूरच्या भूमीत गेल्याशिवाय आम्हा वारकऱयांना शांतता मिळणार नाही. आता विठ्ठलानेच या महामारीतून सुटका करावी, असे ते शेवटी म्हणाले.