प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी आरोग्य यंत्रणा राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून ज्या ज्या गाईडलाईन येतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला कधी प्रारंभ होईल याकडेच आता नजरा आहेत. दररोज आढळून येणाऱया बाधितांपेक्षा उपचार करुन बरे होवून घरी जाणाऱयांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कोरोनामुक्तीचा जिह्यातील रिकव्हरी रेट चांगला आहे. कोरोना सुरु झाल्यापासून आजपर्यंत 50 हजार 800 जण कोरोनुमक्त झाले आहेत. तर आज नव्याने 5 जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात …. बाधित आढळून आले आहेत.
जिह्यावासियांना कोरोनाने सुरुवातीचे काही महिने पुरते डेंजरझोनमध्ये नेवून सोडले होते. आता मात्र, कोरोना रुग्ण बाधित होण्याचे दररोजचे प्रमाण 100 च्या खाली आले आहे. त्यापेक्षा बरे होवून घरी सोडण्याचे प्रमाण 100 ते 120 च्या दरम्यान आहे. स्वॅब तपासणी दररोज दोनशे ते अडीचशे जणांची केली जात आहे. प्रशासनाकडून कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. त्याकरता लस आल्यानंतर ती कशाप्रकारे द्यायची. याची प्रशिक्षण सध्या आरोग्य विभागामध्ये सुरु आहेत. जिह्यातील 71 प्राथमिक केंद्रे, 400 उपकेंद्रे, 11 ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्य विभागातील इतर यंत्रणा यात व्यस्त आहे. परंतु अजूनही प्रत्यक्ष लस जिह्यात कधी येते. पुढे नेमकी उपलब्ध झाली तर ती पहिली कोणाला देणार याकडे सगळय़ांच्या नजरा आहेत. लस कशी द्यायची याचे सगळे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ज्यांना इतर आजार आहेत. असे असताना दुसऱया बाजूला जिह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज 80 ते 90 च्या आसपास आढळून येत आहे. त्यामुळे अजूनही नागरिक काळजी घेत आहेत. काही ठिकाणी बिनधास्तपणे जरी वागत असले तरीही प्रशासनाकडून सक्त सूचना दिल्या जात आहेत. कराड शहर आणि तालुक्यातील बाधितांचे प्रमाण कमी झाले. त्यास कराडकरांनी स्वतःला लावून घेतलेली शिस्त, पाळलेले नियम आहेत. तर सातारा शहर व तालुक्यात प्रशासन प्रयत्न करत असले तरीही अजूनही बाधित होण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा शहरात आहे. बहुतांशी पेठात रुग्ण आढळत असले तरीही नागरिकही कोरोनाची काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे बाधित होणाऱयांमध्ये बरे होणाऱयांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनामुक्तीचा वेग जास्त आहे हे दिसून येत आहे.