उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे उद्गार
प्रतिनिधी/ मडगाव
राज्यात प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे कोरोनापासून राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहे. यासाठी पोलीस व आरोग्य खात्यातील कर्मचारी स्वताचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. कोरोना व्हायरस संदर्भात कुणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर म्हणाले.
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढल्याने सरकारला दोषी ठरवून कोणताच फायदा नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन चालूच ठेऊन आपण सरकार चालवू शकत नाही. आज कोरोनाचे रुग्ण वाढल्यानेही लोक घाबरत नाही. बिंधास्तपणे लोक आज फिरत आहे. हे बंद होण्याचे गरजेचे असून त्यामुळे जनतेने सरकारला दोष न देता स्वताची जबाबदारी संभाळण्याची गरज आहे. जरी सरकारने ‘भिवपाची गरज ना’ अशा प्रकारचे विधान केले असले तरीही लोकांनी आपली काळजी घेण्याची अत्यंत गरजेचे आहे. असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर म्हणाले.
मडगाव दक्षिण गोवा जिल्हाधीकारी कार्यालयात कोरोना व्हायरससंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचा आढावा प्रसार माध्यमांना देताना ते बोलत होते. या बैठकीत डॉ. आयरा आल्मेदा, आरोग्य अधिकारी पोलीस व अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्या प्रमाणे दक्षिण गोवा जिल्हाधीकारी अजीत रॉय यांना घेऊन बैठक घेण्यात आली. यात आपण या व्हायरसवर कशा प्रकारे नियंत्रण आणू शकतात यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जर कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही नियोजन केलेले आहे. आतापर्यंत राज्यात सात कोविड सेंटर आहे. आता कोविड सेंटर वाढविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे फोंडा येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यलयाच्या हॉस्टेलमध्ये 420 रुग्णांना उपचार करण्यासाठी खाटा घालण्यात येईल. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रत्येक तालुक्यमधील सामाजिक सभागृहाचा उपयोग केला जाईल असे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.
आता प्रत्येकाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. युवकांनी रात्रीच्यावेळी गरज नसताना बाहेर पडू नये. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी नियंत्रण ठेऊ शकणार नाही. तसेच प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करावा. जिथे कंन्टेमेन्ट झोन म्हणून घोषित केले जाते आहे. त्या ठीकाणी लोकांना जेवण्याची सोय कशा पद्धतीने करु शकतात यावरही चर्चा करण्यात आली. असे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात नियम वेगळे होते. आता आपण अनलॉकमध्ये असून त्यामुळे पोलिसांनाही जास्त अधिकार नाही. लोकांना या व्हायरसपासून वाचविण्याकरिता लाऊड स्पीकरच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जाईल. तसेच या व्हायरसपासून लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. आंबेली संबंधीत 13 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यातले 11 रुग्ण बरे झालेले आहेत. असे मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रीग्स यांनी सांगितले.