प्रतिनिधी / सांगली
कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर सानुग्रह अनुदान तात्काळ द्या, अशी मागणी राज्य अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य.यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने २ जून २०२० रोजी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येकी ५० लाखांचे विमा कवच लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपल्या मंत्रीमडळाकडून मागणी मान्य करून तसा ७ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय झालेला आहे. परंतु कोरोनाच्या काळात शासन आखून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार विविध जबाबदारी पार पाडताना कोरोना विषाणूचा संसर्गजन्य होऊन मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार ५० लाखाचे अपेक्षित सानुग्रह आर्थिक मदत मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या जवळपास २१३ वर पोहचलेली आहे. मृत्यूपश्चातही उपचाराचे लाखो रूपये चुकवण्याची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली आहे. त्यामुळे कोरोना काळात मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयाकडून अपूर्ण असलेल्या कागदपत्रांची पूर्ततेसाठी संधी देऊन त्यांना तत्काळ ५० लाख रूपये सानुग्रह अनुदान द्यावे आणि मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वारसास तत्काळ अनुकंपाखाली सेवेत रुजु करून घ्यावे. अशा आशयाचे निवेदन संजय कांबळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.