प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात अनेक शेतकरी भोपळा या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतात. यावर्षीही शेतकऱयांनी भोपळयाचे पीक घेतले मात्र, त्यांना कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे.
भोपळा हा प्रामुख्याने मोठमोठय़ा शाकाहारी आणि मासांहारी हॉटेलमध्ये थेट पाठवला जातो. यावर्षी शेतकऱयांना हॉटेल्स बंद असल्याने भोपळा पाठवता आला नाही. त्यामुळे शेतातच भोपळा कुजून गेला आहे. खरीपासाठी नव्याने पीकही घेता आले नाही. जिह्यात अनेक शेतकरी हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयोग शेतात केले जातात. त्याचप्रमाणे शेतात भोपळयाचे पिक घेतले जातात. सातारा जिह्यात वाई, कराड या तालुक्यातील काही शेतकरी हे भोपळ्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन काढतात. उत्पादित केलेला भोपळा थेट मुंबई, पुणे, लोणावळा येथील हॉटेल्सना पाठवण्यात येतो. यावर्षी मात्र घेण्यात आलेला भोपळय़ाचे उत्पादन हॉटेल्स बंद असल्याने मागणी बंद झाली. तयार झालेले भोपळे शेतातच कुजून जावू लागले आहेत.
बावधन (ता.वाई) येथील शेतकरी गणेश दाभाडे हे ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, यावर्षी भोपळय़ाचे पीक एक एकरात घेतले होते. त्याकरता 10 हजार रुपयांचे भांडवल गुंतवले. पण लॉकडाऊनमुळे तोटा सहन करावा लागला आहे.