पालकमंत्री जगदीश शेट्टर यांचे जनतेला आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा सामना सर्वांनीच संघटितपणे करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्याचे जाहीर केल्यानंतर जनतेने आतापर्यंत सहकार्य केले आहे. यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले. जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे उपलब्ध केल्या जातील. जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱया सर्व वाहनांना मुभा दिली जाईल. याबाबत सरकारनेच आदेश काढला आहे. तेव्हा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिह्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जगदीश शेट्टर सरकारी विश्रामधाम येथे आले होते. त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सरकारने सर्व ती व्यवस्था केली आहे. बेळगाव जिह्यामध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, ही बाब चांगली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळेच हे साध्य झाले आहे. याबद्दल त्यांनी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व जिल्हाधिकाऱयांचे कौतुक केले.
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱयांवर बंदी घातली गेली आहे. याचबरोबर कर्नाटकातूनही महाराष्ट्रात जाण्यास बंदी असून प्रत्येकाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच रहावे. सरकार त्यांना सर्व ती मदत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गोवा व महाराष्ट्र सरकारला योग्य ती सूचना केली आहे. यापुढेही त्यांना वेळोवेळी सूचना करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
जिह्यामध्ये पाण्याची समस्या नाही. आतापर्यंत एकाही गावामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. सध्या असलेल्या कोरोनाबाबतच साऱयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तेव्हा कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डामध्ये जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्याबाबत पाऊल उचलण्यात आले आहे. त्या ठिकाणीच जनतेने खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी जवळपास एक तास अधिकाऱयांची बैठक घेऊन समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, बिम्सचे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप, जिल्हा आरोग्याधिकारी मुन्याळ, महापालिका आयुक्त जगदीश यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
1 हजार जणांची क्वारंटाईन व्यवस्था
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्वॉरंटाईन व्यवस्थेवर अधिक भर देण्यात आला आहे. राजस्थान व इतर भागातून आलेल्या लोकांवर सामूहिक क्वॉरंटाईन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी पालकमंत्र्यांना दिली. बेळगावबरोबरच हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, निपाणी या परिसरातही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध नाहीत
वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणू पसरतो, अशा अफवा पसरविण्यात आल्या. मात्र वृत्तपत्रामुळे विषाणू पसरत नाही. त्यामुळे सरकारने वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध घातले नाहीत. याबाबत केंद्र सरकारनेच सर्व राज्यांना हा आदेश पाठविला आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर कोणत्याही वृत्तपत्र विपेत्याला पोलिसांनी किंवा अधिकाऱयांनी त्रास देऊ नये, अशी सक्त ताकीद पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱयांना दिली आहे.