बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात बाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढली आये. यातच सोमवारी राज्यातील आरोग्य विभागाने १३ जिल्ह्यांमधील ७३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. एकट्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हैसूर जिल्ह्यात सहा, शिवमोगा जिल्ह्यात तीन, धारवाड जिल्ह्यात पाच, कोडुगु, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि गडाग, दावणगिरी, हवेरी, हासन, तुमकुरू आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात एक रुग्ण मरण पावला आहे.
सोमवारी आरोग्य विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव जावेद अख्तर यांनी एक अधिसूचना जारी केली की, यामध्ये त्यांनी साथीच्या रोग संदर्भात केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हंटल आहे.
तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी करण्यासाठी नमुने दिल्यानंतर रुग्णांना अहवाल येईपर्यंत घरी अलग ठेवावे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे गरजचे आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे योग्य ते पालन करणे आवश्यक आहे. तरच कोरोना संक्रमण रोखण्यात यश येईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे .