वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोरोना काळात महाराष्ट्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी व्हाट्सअप, गुगल,युट्युब या माध्यमातून नवे – प्रयोग करून शिक्षकांनी शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण पोहोचवण्याचे काम केले, त्यामुळे या शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडे असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांनी कणेरीवाडी (तालुका करवीर) येथील डिजिटल शाळा उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले,
या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय मंडलिक आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत असगावकर जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील गोकुळचे संचालक विश्वास पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर अमन मित्तल यावेळी उपस्थित होते,
यावेळी पुढे बोलताना नामदार गायकवाड म्हणाल्या कोरोना काळात सरकारने जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबवली तशीच संकल्पना आपण माझी शाळा माझी जबाबदारी या माध्यमातून आपण शाळा चालू करणार आहोत. त्याचबरोबर सध्या शाळा डिजिटल स्वरूपात चालू असून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध भाषांचे ज्ञान व प्रत्येक शाळेत ग्रंथालय करण्याचा संकल्प सरकारचा असून येणाऱ्या पुढच्या काळात या दोन्ही गोष्टी ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहायला मिळतील. तसेच कणेरीवाडी शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत पट असून शाळेची गावातील ग्रामस्थांनी केलेली प्रगती पाहून आठवीच्या वर्गाला ही ताबडतोब मान्यता देण्याचे काम आपण लवकरच करू असे आश्वासनही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी कणेरीवाडी ग्रामस्थांना दिले.
या कार्यक्रमाला कणेरीवाडी गावचे सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती गावातील सर्व तरुण मंडळी परिसरातील सर्व गावातील सरपंच तसेच भागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.