ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सन 2021-22 साठीचा अर्थसंकल्प मांडत आहेत. दरम्यान, कोरोना काळात केंद्र सरकारने केलेल्या मदतीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
केंद्र सरकारने कोरोना काळात आत्मनिर्भर पॅकेजसारख्या योजना आणल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा पुढे नेणे हा त्यामागचा हेतू होता. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 27.1 लाख कोटींची मदत करण्यात आली. ही मदत पाच मिनी बजेट एवढी होती. कोरोना काळात 80 कोटी लोकांना धान्य देण्यात आले. तर 8 कोटी जनतेला गॅस कनेक्शन देण्यात आले, असे सीतारामन यांनी सांगितले.