बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत असताना कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना राबवाव्यात असे केंद्राने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांना सुनावले.
आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना सर्वाधिक कोरोना चाचण्या, प्रभावी आरोग्य व्यवस्था विविध स्तरांवर कार्यक्षम देखरेखीसह मृत्युदर कमी करण्यासाठी सल्ला दिला. एका दिवसात नोंदवलेल्या सर्वाधिक प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्रात केवळ २२ घटना घडल्या आहेत.
केंद्राने प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रात, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि प्रभावी यंत्रणा राबविण्याचा सल्ला दिला.
आंध्र प्रदेशात, प्रकाशम आणि चित्तूर जिल्ह्यांत सुविधानिहाय मृत्यूची दैनंदिन देखरेखीची गरज, हॉस्पिटलची सुविधा बळकट करणे, योग्य काळजी वाहकांची संख्या वाढवणे (आयसीयू), ऑक्सिजन पुरवठा आणि कार्यक्षम क्लिनिकल व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
कर्नाटकात, कोपळ, म्हैसूर, दावणगिरी आणि बळ्ळारी या जिल्ह्यांत आरटी-पीसीआर चाचणीचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा.
एकूणच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही तीन राज्ये देशभरात जवळजवळ ४९ टक्के आणि कोविड मृत्यूंपैकी ५७ टक्के पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.