मुलांच्याबाबतीत पालक निर्धास्त राहिल्याने कोरोना वाढण्याची शक्यता अधिक
मनीषा सुभेदार / बेळगाव
कोरोना गेला अशा भ्रमात समस्त बेळगावकर वावरत आहेत. मात्र धोका टळलेला नाही. किंबहुना आगामी काळात तो पुन्हा डोकेवर काढण्याचा धोका अधिक आहे, असे डॉक्टर आणि आरोग्यतज्ञ सांगत आहेत. दुर्दैवाने मुलांच्या बाबतीत पालक निर्धास्त राहिल्याने कोरोना वाढण्याची शक्मयता अधिक निर्माण झाली आहे.
बेंगळूर शहरात 28 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मोठय़ांना जशी त्याची लागण झाली तशी लहान मुलांना ती झाली नव्हती. लहान मुलांना केलेले लसीकरण हे मुलांसाठी पूरक ठरले. मात्र आता पालकांमुळे लहान मुलांना आणि लहान मुलांमुळे घरातील ज्ये÷ांना कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती अधिक आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी तशा घटनाही घडल्या आहेत. बेंगळूर शहरात गेल्या महिन्यात दहा वर्षाखालील 28 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे यापैकी काही मुलांच्या हृदयावर आघात झाला आहे.
सध्या बेळगाव शहरात प्रामुख्याने बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन होतेच असे नाही. बहुसंख्य लोक प्रामुख्याने तरुणाई मास्कशिवाय वावरत आहे. मास्क घातला तर तो हनुवटीवर ठेवून केवळ चकवा देण्याचा प्रकार सुरू आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतर सर्व सरकारी व खासगी कार्यालये, बँका व अन्य आस्थापने सुरू झाली. तेथूनच मुलांना प्रादुर्भाव होण्याची शक्मयता वाढली.
बऱयाच कार्यालयामध्ये एका जरी कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली तर इतरांसाठी धोका वाढतो. बऱयाच कर्मचाऱयांनी कोरोना झाल्याचे सत्य दडपल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. कार्यालयात येणारे कोरोनाबाधित किंवा लक्षणे असणारे कर्मचारी जेंव्हा घरी जातात तेंव्हा त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांना कोरोना होण्याची शक्मयता वाढते. अशाप्रकारे पालकांमुळे मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आणि ज्या ठिकाणी मुलांचे आजी-आजोबा किंवा अन्य सदस्य कुटुंबात आहेत त्यांना कोरोनाची लागण होत आहे, हे वास्तव आहे.
ज्या घरात खोकणारे मूल असू शकते त्याला कदाचित कोरोनाची लागण झालेली असते किंवा तशी लक्षणे आढळून येवू शकतात. मात्र पालक हा खोकला साधा खोकला समजून दुर्लक्ष करतात, हे एक वास्तव आहे. त्याचप्रमाणे पालकांना प्रादुर्भाव होऊन त्यांच्यामुळे मुलांना कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. दुर्दैवाने सध्या बहुसंख्यजण किमान सॅनिटायझरचा वापर करून हात धुतात किंवा साबणाने हात स्वच्छ करतात. परंतु त्यांनी कार्यालयात नेलेली ऑफिस बॅग, लॅपटॉप बॅग, डब्याची पिशवी आणि महिलांकडे नेहमी असणारी व्हॅनीटी पर्स यांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. त्यामुळे त्या बॅगवरती किंवा पालकांच्या कपडय़ांवरती कोरोनाचा विषाणू असण्याची दाट शक्मयता असते.
याच दुर्लक्षामुळे मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे उद्भवू शकतात किंवा त्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो. दुर्दैवाने लहान मुलांना होणाऱया कोरोनाची आकडेवारी उपलब्ध नाही. वास्तविक याचे गांभीर्य ओळखून सरकारने तशी आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. आकडेवारी नसल्याने लहान मुलांना कोरोना होत नाही, अशा भ्रमात पालक वावरत आहेत. माध्यमांमध्येसुद्धा तशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. तथापि पालकांमुळे आता मुलांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पालकांनी विशेषतः नोकरदार पालकांनी याचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. सध्या मुले घरीच आहेत. सुदैवाने ती शाळेत जात नाहीत. परंतु कोरोना संपला नसल्याने वातावरणातून घरातील बाहेर जाणाऱया मंडळींकडून किंवा पालकांकडून मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्मयता असल्याने पालकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
मुलांच्या खेळापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्त्वाची
सध्या सर्वत्र लहान मुले बिनधास्त वावरत आहेत. विशेषतः मुलांचे घोळके पतंग उडविण्यात व किल्ला करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. ही मुले मास्क वापरत नाहीत, सॅनिटायझरपासून ती पूर्ण दूर आहेत आणि सामाजिक अंतराच्या नियमांचा त्यांनी फज्जा उडविला आहे. मुलांच्या खेळापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले मास्क वापरतील, किमान सामाजिक अंतर पाळतील व घोळका करून खेळण्याचे टाळतील, यासाठी पालकांनी मुलांना समजावणे आवश्यक आहे
डॉ. रविंद्र नातू-बालरोगतज्ञ
धोका टळला आहे, असे समजून समाजातील कोरोनाची भीती जावून जो एक निर्धास्तपणा आला आहे तो कधी तरी आपल्याला फार मोठा फटका देणारा ठरू शकतो. किती बालकांना कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती सरकार किंवा प्रशासन देऊ शकत नाही. वास्तविक अशी आकडेवारी जाहीर करणे फार महत्त्वाचे होते. मात्र बऱयाच हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित मुले दाखल झाली आहेत, हे नाकारता येणार नाही. जर घरात खोकणारे मूल असे तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कोरोनाची जी लक्षणे मोठय़ांमध्ये आढळतात तीच लक्षणे लहान मुलांमध्येही असू शकतात. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी यापैकी मुलांमध्ये एकही लक्षण आढळले तर डॉक्टरांकडे जाणे आणि त्वरित उपचार घेणे याशिवाय कोरोना नसल्याची खात्री करून घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. मोठय़ांमुळे लहान मुलांना कोरोना होण्याची शक्मयता 100 टक्के आहे. त्यामुळेच प्रत्येक घरातील पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय दोन वर्षांवरील मुलांनी मास्क वापरणे तितकेच आवश्यक आहे.
…नियमांपासून मुलांचीही सुटका नाही
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसू लागली तसे पालक आपल्या मुलांना सार्वजनिक ठिकाणी घेऊन फिरू लागले आहेत. बस आणि रिक्षामध्येसुद्धा पालकांसमवेत मुले दिसू लागली आहेत. मात्र या मुलांपैकी मास्क घालणाऱयांची संख्या कमी आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या नियमांपासून मुलांचीही सुटका नाही.