प्रतिनिधी/ कराड
कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे पावसाळी अधिवेशनासाठी आज कराडहून मुंबईकडे रवाना झाले.
अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी 5 सप्टेंबर रोजी आर. टी. सी. पी. आर. (कोविड 19) चाचणी केली. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून विधानसभेच्या कामासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. 14 ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचना केल्यानंतर मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कराड येथे जे उपचार चालू होते, तेच मुंबई येथे देखील चालू ठेवले. 21 तारखेला डिस्चार्ज घेऊन ते कराडला आले. त्यानंतर 10 दिवस ते होम आयसोलेट होते. काल पुन्हा चाचणी करुन ती निगेटीव्ह आल्याने मुंबईस रवाना झाले आहेत.