बेंगळूर : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून न देताच संसर्गाच्या नियंत्रणासाठी सरकारने कोणतीही बैठक घेतली तरी त्याच्या काय उपयोग?, असा परखड प्रश्न माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित केला आहे. कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरले असून आता वेळ निघून गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कोरोना नियंत्रणासंबंधी राज्यात कठोर नियम जारी करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. यासंदर्भात कुमारस्वामी यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल ट्विटरवरून टीका केली. संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आणि रुग्णांवर उपचारासाठी पायाभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळाले होते. त्यांनी ही बाब गंभीरपणे विचारात घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. कोरोना रुग्णांना उपचार मिळण्याची हमी नाही. केंद्र सरकारने रेमडेसिवीरची मनाला वाटेल तशा पद्धतीने निर्यात केली आहे. त्यामुळे देशात या लसीचा तुटवडा भासत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील इस्पितळांना रेमडेसिवीरसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे, असे ट्विटही त्यांनी केले आहे.
Trending
- लिव्हिंगस्टोन मायदेशी रवाना
- विधी परीक्षांचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; विनाविलंब शुल्कासह 17 ते 30 मे अर्ज भरण्यास मुदत
- राहूल गांधी यांच्याबरोबर चर्चेसाठी भाजपकडून अभिनव प्रकाश यांचे नाव जाहिर
- ‘सत्य बोलण्यासाठी एफआयआर म्हणजे पदक’: भाजपच्या उमेदवार माधवी लता
- पंतप्रधान मोदींवर कारवाईची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- पावसाच्या हुलकावणीने शेतीच्या मशागतीची कामे लांबली
- Sangli : जिह्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाची हजेरी; भाजीपाला, आंबा, केळीचे नुकसान
- बी. ए. स्पोर्ट्समधून क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी! शिवाजी विद्यापीठात चार वर्षाचा अभ्यासक्रम