सिटीझन कौन्सिलचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना आटोक्मयात आला म्हणून शाळा सुरू करण्याबाबत ज्या हालचाली करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबवावा. महत्वाचे म्हणजे शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्मयात आणण्याचा प्रयत्न करु नये, दुसरी लाट येण्याची शक्मयता अनेकांनी वर्तविली आहे. किमान जानेवारीपर्यंत तरी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेवू नये. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी समस्त पालकांची आहे. तेंव्हा त्याबाबत गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी सिटीझन कौन्सिलचे चेअरमन सतीश तेंडोलकर यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
शाळा सुरू करण्याबाबत काही मंत्री तसेच लोकप्रतिनिधी आणि काही संघटनाही वक्तव्य करत आहेत. मात्र शाळा सुरू झाल्या तर कोरोना वाढण्याची भिती आहे. मुलांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे गरजेचे आहे. यावषी प्रथम आरोग्य आणि आपला जीव सांभाळणे महत्व दिले पाहिजे. जीव जगला तर शिक्षण घेता येते. मात्र या शिक्षणामुळे कुणाचा जीव जावू नये, याची दक्षता घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार व्हावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
गेले 7 ते 8 महिने आम्ही सर्वच जण कोरोनाशी लढा देत आहोत. सध्या कोरोना आटोक्मयात आला आहे. ही बाबत समाधानकारक आहे. पण दक्षता घेणेही तितकेच महत्वाचे आहे. शाळा सुरू झाल्या तर ऑटोरिक्षा, बस हे देखील सुरू करावे लागणार आहेत. त्यामुळे हा कोरोना वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. शाळा सुरू करताना प्रथम शाळांचे सॅनिटायझेशन करणे महत्वाचे आहे.
दरम्यान महत्वाचे म्हणजे, पालकांकडून शाळांनी फी घेवू नये. सरकारने संपूर्ण फी माफ करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली. विद्यार्थ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यांना पौष्टिक आहाराबरोबरच प्रतिकार शक्ती वाढविण्याची औषधे देखील देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची वरचेवर आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकेही तैनात करणे महत्वाचे आहे. तेंव्हा ही सर्व काळजी घेवून त्यानंतरच शाळा सुरू कराव्यात. दिवासाला किमान 1 तास प्रत्येक शाळेमध्ये योगा क्लास घेणेही तितकेच महत्वाचे आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर त्यांनी ही मागणी रास्त असून सरकारकडे हे निवेदन पाठवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, निवृत्त रेल्वे अधिकारी एस. सुरेश आदी उपस्थित होते.