अजमेरहून परतलेल्या 30 जणांना कोरोनाची लागण
प्रतिनिधी/ निपाणी
कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, आजरा, चंदगड, कुडची, संकेश्वर येथे कोरोना रुग्ण आढळल्याने एकप्रकारे कोरोनाने निपाणीला चारही बाजूने घेरले होते. त्यामुळे निपाणीकरही धास्तावले होते. असे असतानाच अजमेरहून आलेल्या व तवंदी येथील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलेल्या 38 पैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या 30 पैकी 22 जण बेळगाव जिल्हय़ातील तर 8 जण बागलकोट जिल्हय़ातील आहेत. या 30 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली. या प्रवाशांनी निपाणी शहरात प्रवेश केलेला नसला तरीही परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबरोबरच आता बेळगाव जिल्हय़ातील कोरोना बाधितांचा आकडा 107 वर पोहचला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील बेळगाव, निपाणी, संकेश्वर, गोटूर, हुक्केरी, रायबाग आदी विविध भागातील शासकीय विश्रामगृहांची देखभाल सांभाळणाऱया कुटुंबांमधील 38 जण दोन म†िहन्यांपूर्वी राजस्थानमधील अजमेर येथील दर्गाहच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर अचानकपणे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सदर 38 जणांना गावी परतण्यात अडचण निर्माण झाली होती. यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून राजस्थान सरकारच्या परवानगीने हे 38 जण गावी परतत होते.
त्यानुसार 3 मे रोजी सदर प्रवासी कोगनोळी टोलनाका नजीक आले असता कर्नाटक सरकारची परवानगी नसल्याने त्यांना तेथेच थांबविण्यात आले होते. मंत्री शशिकला जोल्ले यांनी या प्रकरणी लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधत या भाविकांना कर्नाटकात प्रवेश देण्याची सोय करून दिली. मात्र, खबरदारी म्हणून या सर्वांना घरी न पाठविता त्यांना तवंदी घाटातील मोरारजी देसाई वसती शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथे या सर्वांचा स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
त्यानुसार रविवारी सकाळी या 38 जणांपैकी 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे बेळगाव व बागलकोट जिल्हय़ात एकच खळबळ उडाली. यामध्ये 50 वषीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 60 वषीय वृद्धा, 14 वषीय मुलगी, 40 वषीय महिला, 56 वषीय महिला, 60 वषीय वृद्धा, 25 वषीय महिला, 3 वर्षांची बालिका, 46 वषीय महिला, 50 वर्षीय महिला, 27 वषीय महिला, 8 वषीय बालिका, 38 वषीय युवक, 10 वषीय मुलगा, 63 वषीय वृद्ध, 20 वषीय तरुण, 29 वषीय तरुण, 12 वर्षांचा मुलगा, 14 वर्षांचा मुलगा, 3 वषीय बालक व 6 वषीय बालकाचा या बाधितांमध्ये समावेश आहे.
अन्य 8 जणांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. असे असले तरी अहवाल आलेले सर्वचजण पॉझिटिव्ह निघाल्याने निपाणी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही बातमी सर्वत्र वाऱयासारखी पसरली. त्यानंतर एकच फोनाफोनी सुरू झाली. अनेक व्यापाऱयांनी स्वतःहून आपली दुकाने बंद करून घरी जाणे पसंद केले.
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 107 वर पोहोचली असून बेंगळूर पाठोपाठ राज्यात बेळगाव दुसऱया क्रमांकावर आले आहे. 88 रुग्णसंख्या असलेले म्हैसूर आतापर्यंत दुसऱया क्रमांकावर होते. रविवारी बेळगाव जिल्हय़ात आणखी 22 बाधितांची भर पडल्यामुळे एका दिवसात बेळगाव जिल्हय़ाने दुसरा क्रमांक गाठला आहे.
शासनाची परवानगी नसतानाही….
दरम्यान 3 मे रोजी कर्नाटक हद्दीनजीक हे प्रवासी राष्ट्रीय महामार्गावरुन कोगनोळी टोलनाक्यानजीक आले होते. त्यावेळी कर्नाटक हद्दीत प्रवेश करण्यासाठी सरकारची परवानगी त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांची चर्चा करून, या प्रवाशांना कर्नाटकात घेत त्यांना तवंदी येथील वसतीशाळेत क्वारंटाईन केले. त्यामुळे निपाणीकरांवरील धोका टळला असल्याचे मंत्री शशिकला जोल्ले यांनी नगरपालिकेत आयोजित बैठकीत स्पष्ट केले.
कोगनोळी नाक्यावर बंदोबस्तात वाढ…
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया अनेक प्रवाशांमध्ये रविवारी कोरोनाची लक्षणे आढळल्याने प्रशासनाने याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कागदोपत्री व आरोग्याची पूर्णपणे तपासणी करूनच संबंधित प्रवाशांना कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जात आहे.
155 जणांचे अहवाल निगेटिव्ह
रविवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार गेल्या 24 तासात बेळगाव जिल्हय़ातून पाठविण्यात आलेले 155 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 272 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 7873 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 2,966 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 576 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 6 हजार 121 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 107 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 37 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 77 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
अथणी, चिकोडी, निपाणीत सतर्कता
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये 13 महिला व 7 लहान मुलांचा समावेश आहे. बागलकोट व बदामी येथील 8 जणांनाही बेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हय़ातील 22 जण हे अथणी, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, रायबाग, गोटूर परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. यामधील बहुतेक जण सरकारी विश्रामधामातील स्वयंपाकी असून ते सर्वजण आपापल्या कुटुंबीयांना घेऊन अजमेर शरीफला गेले होते. बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील 7 कुटुंबातील 38 जण अजमेरला गेले होते. त्यापैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून आणखी 8 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे 22 जण नेमके कोणकोणत्या गावातील आहेत याचा तपशील प्रशासनाने उघड केला नाही.