रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवल्या : बळींच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन : कुटुंबीयांना संसर्ग होणार नाही यासाठी खबरदारीचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या बैलहोंगल तालुक्मयातील काही गावांना भेटी देऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील बाधितांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. कोरोनामुळे ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
रविवारी कित्तूर, एम. के. हुबळी, नेगिनहाळ, हुलीकट्टी आदी गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश दोड्डगौडर, प्रांताधिकारी शशिधर बगली आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण बैलहोंगल तालुक्मयात नेगिनहाळ गावात कोरोनाचा फैलाव अधिक आहे. या एकाच गावात रुग्णसंख्याही अधिक आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्याही रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. नेगिनहाळ गावाजवळ सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन या सेंटरमध्ये उपचार घेणाऱया बाधितांशी जिल्हाधिकाऱयांनी चर्चा केली. त्यानंतर ग्राम पंचायत सदस्य व आशा-अंगणवाडी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
तातडीने रोगनिदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. खोकला, थंडीताप, सर्दी आदींनी त्रस्त असणाऱयांनी स्वतःहून जवळच्या आरोग्य केंद्रांना भेट देऊन आपली तपासणी करून घ्यावी. रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्यास घरी न राहता जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन तेथे उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या झटत आहेत. प्रत्येक गावातील बाधित व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जमविण्याबरोबरच त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविणे, त्यांच्या औषधोपचारावर नियंत्रण ठेवणे आदी कामे त्या करीत आहेत. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी केले.
आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्या उपस्थितीत कित्तूरमध्येही अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. रॅपिड अँटिजेन टेस्ट असो किंवा आरटी-पीसीआर टेस्ट असो, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी न राहता तातडीने कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यास फैलाव रोखता येणार आहे. आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने यासंबंधी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी केले.