सरकारी आकडा मात्र 61 वर, बेळगाव, अथणी तालुक्मयांत सर्वाधिक बळी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोना बळींच्या संख्येने शंभरी पार केली आहे. अथणी व बेळगाव तालुक्मयात ही संख्या अधिक आहे. बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार मृतांचा आकडा 61 आहे.
गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. आणखी 16 हून अधिक मृतदेह शवागारात पडून आहेत. काही प्रक्रिया पूर्ण करून या मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्याभरात 130 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका अथणी तालुक्मयातील 40 हून अधिक जणांचा समावेश आहे. यानंतरचा क्रमांक बेळगावचा लागतो. अनेकांचा मृत्यू सारीमुळे झाला आहे. श्वसनाचा त्रास, हृदयाघात आदी कारणांमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढती आहे.
सुरुवातीला 50 वर्षांवरील किंवा 60 पार केलेल्यांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक होते. गेल्या आठ दिवसांत 25 ते 30 वषीय वयोगटातील युवकांचाही बळी जात आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. खासगी इस्पितळातील उपचार परवडत नाहीत आणि सरकारी इस्पितळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे व्यवस्था कोलमडली आहे. या परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांवर उपचार करणे बंद झाले आहे. खासगी डॉक्टरांपैकी अनेकांनी आपली सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे. त्यामुळे मधुमेह, अतिरिक्तदाब आदींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रदीर्घ आजारांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिन्याची मोफत औषधे दिली जात होती. आता सेवाच बंद असल्यामुळे ही औषधे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील विविध जिल्हय़ात श्वसनाच्या त्रासामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या मोठी आहे. याबरोबरच ताप, खोकला आदी कारणेही देण्यात आली आहेत. ताप, खोकल्याच्या तक्रारी घेऊन वेगवेगळय़ा इस्पितळात दाखल झालेल्यांवर मृत्यू ओढत आहे. बुधवारी राज्यातील 92 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र यामध्ये जास्तीतजास्त जण श्वसनाच्या त्रासामुळे दगावल्याचा हेल्थ बुलेटिनमध्ये उल्लेख आहे.