राज्यात बिगर गोमंतकीयांचे मृत्यू झालेच नाही की काय? : किरण कांदोळकर यांचा सवाल
प्रतिनिधी / म्हापसा
आपण भारतीय जनता पक्षामध्ये आमदार म्हणून काम केलेले आहे. केंद्रातून आज भाजपचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात येतात ही सर्व नौटंकी आहे. केंद्रातून एखादा नेता येतो आणि सर्वत्र त्याची प्रसिद्धी करतात, ते येऊन काय करणार. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेलीच नाही.
कोरोनामुळे 2800 लोकांचे बळी गेले याबाबत आज बी. एल. संतोष यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना भाजपचे सरचिटणीस यांनी बी. एल. संतोष यांनी विचारणा करावी. दर दिवशी 14 ते 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतो, हे सत्र सुरूच आहे. नोंदणीशिवाय किती मरतात हे परमेश्वरालाच ठाऊक. मे महिन्यात एकही बिगरगोमंतकीयाच्या मृत्यूची नोंद नाही त्यामुळे फक्त गोव्यातीलच लोकांचे बळी गेले आहेत. बिगर गोमंतकीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही की काय, हा मोठा संशोधनाचा विषय आहे? असा सवालही गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
प्रथम कोरोनाची समस्या संपवा, मगच राजकारण करा
सावंतवाडी ते कारवारपर्यंत राज्यात तपासणीसाठी येतात. बिहारी, यूपी, कर्नाटक आदी भरती होतात, त्यांना कोरोना होत नाही काय. बी. एल. संतोष यांनी यावेळी येणे योग्य नाही. राजकारण यावेळी करणे योग्य नाही. सरकारने प्रथम कोरोनाची लाट घालविणे आवश्यक आहे. यातून एकच दिसून येते सरकारला निवडणुका लवकर घेण्याची घाई आहे, ते आठ महिन्यांनी म्हणत आहेत, मात्र त्या त्या कधीही होऊ शकतात. यासाठी संतोष यांना लवकर धावून यावे लागले. पुढच्या महिन्यात निवडणुका म्हटल्या तरी आम्ही तयार आहोत. थिवी व हळदोणाचे नागरिक आतूरतेने वाट पाहत आहेत, कारण येथील आमदारांना लोक कंटाळललेले आहेत, असे कांदोळकर म्हणाले.
निवडणुका होण्यापूर्वी सर्व नागरिकांना लसीकरण करावे, अशी मागणीही आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. कारण गोवा छोटे राज्य आहे आणि कसलाही प्रयोग प्रथम गोव्यात केला जातो, अशी माहिती कांदोळकर यांनी दिली.
राजकीय क्रांतीवर आपण भाष्य करणार नाही
येत्या 18 तारखेला क्रांती दिवस आहे, प्रथम तो दिवस येऊ द्या राज्यात. मंत्री मायकल लोबो म्हणतात, राज्यात मोठी राजकीय क्रांती होणार, यावर आपण काहीच भाष्य करणार नाही. आपण सध्या गोवा फॉरवर्डमध्ये आहे. गोव्याची राजकीय परिस्थिती सध्या संवेदनशील आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी एकत्र यावे, त्याचा अंदाज घेऊन ाgढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोबो सध्या सरकारात मंत्री आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे पाच सहा महिने उरले आहेत. काहीही होऊ शकते. लोबोंच्या विधानावर आपण भाष्य करीत नाही.
सध्यातरी राजकीय घडामोडांचे संकेत नाही
राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत सध्यातरी आपल्यास दिसत नाहीत. भाजपला वाटते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चांगले राज्य चालवितात. कारण काही दिवसांपूर्वी सर्व सोशल मीडीयावर संदेश येत होता नो वन बेटर हँडल देन प्रमोद सावंत. भाजपच्या भक्तांनी हा संदेश सर्वत्र प्रसारित केला होता. मीही म्हणतो डॉ. सावंत यांनी गोवा वेगळय़ा पद्धतीने हँडल केला आहे. पूर्वी घरचा माणूस आजारी पडला तर त्याला बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करत असत. काही बरे-वाईट झाल्यास सगे सोयरे अंतिम दर्शन घेतल्यावर स्मशानभूमीत नेत होते; मात्र डॉ. सावंत यांनी सर्वांनाच स्मशानभूमीत जाण्यास भाग पाडले. त्यात महिलाही अपवाद नाही त्यांनी स्मशानभूमीत नेण्याची परिस्थिती आणली.
गोवा अदानी, अंबानांच्या घशात घालण्याचा डाव
गोव्यात ऍप ‘अपना भाडा’ याला परवानगी दिली आहे काय असा प्रश्न एका मंत्र्याला केला असता त्यांनी नाही, असे उत्तर दिले. आम्हाला मंत्र्यांची वा ऍपची परवानगीची गरज नाही. हे भाष्य गोवेकरांसाठी लाजीरवाणे आहे. हा ऍप अपना भाडा रिलायन्सच्या बॅनरखाली पत्रकार परिषद घेतात. यात रिलायन्स या व्यवसायात उतरला हे स्पष्ट होते. गोव्याचे टॅक्सीवाले गोवा माईल्स विरोधात धरणे आंदोलन करीत होते. 30 एप्रिलला अंबानीचे ऍप अपना भाडा ने राज्यात प्रवेश केला. गोवेकरांचा विरोध असतानाही या सरकारने त्यांना मदत केली. सर्व सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. सरकारच्या बेजबाबदारापणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. राज्यात संचारबंदी करावी लागली. पर्यटनावर जे अवलंबून होते. त्यांच्यावर उपासमारी आली. सरकार या लोकांना मदत करण्याऐवजी अदानी आणि अंबानी यांना गोवा राज्य विकायला उठले आहे. सरकारने हे ऍप मागे घेऊन गोमंतकीय नागरिकांसोबत रहावे, अशी मागणी किरण कांदोळकर यांनी केली.