खानापूरच्या बाजारात जनावरांची तुरळक गर्दी : कसदार शेतकऱयांना फटका ; मात्र, दलालांचे व्यवहार फोफावलेलेच
पिराजी कुऱहाडे / खानापूर
दुग्धोत्पादन व पशुपालन हा खानापूर तालुक्मयातील शेतकऱयांचा व्यवसाय आहे. यासाठी तालुका जनावरांच्या बाजारात दर रविवारी कोटय़वधीची उलाढाल होते. परंतु सहा महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे जनावरांच्या बाजारावर अवकळा आली असून अनेकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. रविवारी बाजारात खरेदी-विक्रीसाठी जनावरांची संख्या रोडावलेली दिसून आली. खानापूर तालुक्मयात बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी तसेच पशुपालनाठी जनावरांची खरेदी-विक्री अधिक प्रमाणात करतात. सद्यस्थितीत दुभत्या जनावरांना बाजारात मोठी मागणी आहे. परंतु कोरोना महामारीमुळे जनावरांचा बाजार जवळजवळ ओस पडल्याने दुग्ध व्यवसाय करणाऱया शेतकऱयांना फटका बसला आहे.
तालुक्मयात दुभत्या जनावरांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या दुभत्या गाई-म्हशींच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात मोठी गर्दी होते. सद्य परिस्थितीत उत्तम प्रतीच्या म्हशीची किंमत 50 ते 80 हजारापर्यंत आहे. गाईची किंमत 50 हजाराच्या घरात आहे. राज्य सरकारने दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिल्याने बहुतांश शेतकरी या व्यवसायाकडे वळला आहे. दुग्ध व्यवसाय आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. ऊस वगळता दुसऱया कोणत्याही व्यापारी पिकांची लागवड तालुक्मयात होत नसल्याने बहुतांश शेतकरी भात पिकांवर समाधान मानतो. भात पीक उत्पादन हे पावसावर अवलंबून
आहे.
कठीण परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायदेशीर
यासाठी कठीण परिस्थितीत शेतकऱयांना पशुपालन हाच मोठा आधार वाटतो. खानापूर येथील जनावरांचा बाजार बेळगाव-गोवा महामार्गावरील करंबळ कत्रीवरील बांधकाम खात्याच्या जागेवर भाडेतत्त्वावर सुरू आहे. बाजारात सुविधांचा अभाव आहे. दैनंदिन उपजीविकेसाठी असणाऱया बाजारपेठा खुला करण्यात आल्या असल्या तरी जनावरांची बाजारपेठ मात्र अपेक्षितरीत्या भरत नसल्याने खरेदी-विक्री करणाऱया शेतकऱयांना याचा फटका बसत आहे. येथील जनावरांच्या बाजारात वाजवी किंमत आहे. परंतु बाजार भरत नसल्याने गावागावात फिरणाऱया दलालांकडून शेतकऱयांची फसवणूक होत आहे. बाजार भरत नसल्याने फिरते व्यापारी गावातीलच काही दलालांना हाताशी धरून जनावरांची किंमत कमी करून सर्वसामान्यांना लुटताना दिसत आहेत. जनावरांच्या बाजारात एकाहून अधिक जण त्या जनावरांची किंमत करतात. गावात दलाल पडत्या दराने जनावरांची किंमत करून सर्वसामान्यांना लुटत आहेत. बाजारपेठेत 50 हजार रुपये किमतीच्या म्हशीची किंमत केवळ तीस-चाळीस हजारपर्यंत ठरवत आहेत. सर्वसामान्य शेतकऱयांना दलालांची भाषा कळणे कठीण असते. त्यामुळे दलाल नकळत सर्वसामान्य शेतकऱयांना फसवत आहेत. सध्या बाजारपेठ बंद असल्याने दुभत्या जनावरांच्या बाबतीत शेतकऱयांची फसवणूक होत आहे.
बैलजोडय़ाही झाली कमी
शेतकऱयांच्या बैलजोडय़ा अलीकडच्या काळात कमी होत चालल्या आहेत. बहुतांश शेतकरी हंगामापुरता बैलजोडय़ा बाळगताना दिसत आहेत. कारण पावसाळय़ातील चाऱयाचा प्रश्न पाहता अनेक शेतकरी बैलजोडी शेती हंगामापर्यंत पाळतात व त्यानंतर विकतात. त्यामुळे शेतकऱयांना आता वाजवी दरात बैलजोडय़ा मिळणे कठीण झाले आहे. शेतीची कामे यंत्राच्या साहाय्याने होत असल्याने बैलजोडय़ा पाळणे शेतकऱयांनी कमी केले आहे. पण हौशी बैलजोडी पाळणारे शेतकरी बैलजोडी व देशी गाय पालनात कधीही खंड पडू देत नाहीत.
उत्तम बैलजोडय़ा खरेदी-विक्रीसाठी
हौशी शेतकऱयांची रेलचेल
तालुक्मयातील अनेक शेतकरी बैलजोडय़ा पाळून शर्यतीच्या फडात आपला ठसा उमटवणारे आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाबरोबर बैलांच्या शर्यतीतही शेतकऱयांचा नेहमी गोतावळा असतो. अशा ठिकाणी उत्तम बैलजोडय़ा खरेदी-विक्रीसाठी हौशी शेतकऱयांची रेलचेल असतेच. पण तालुक्मयाच्या जनावरांच्या आठवडी बाजाराच्या परिस्थितीमुळे खरेदी-विक्रीसाठी तो मागे राहिला आहे.