प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव वाढत असताना नव्याने ग्राम पंचायतींवर निवडून आलेल्या सदस्यांना ग्राम सभेसाठी वाट पहावी लागत आहे. आता कोरोना महामारी आटोक्मयात आल्यानंतरच ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वच अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्याआधीच ग्रामसभा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्या अजूनही होणार नसल्याचे दिसून येत आहे.
57 ग्रामसभा घेण्याचे आदेश बजावण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग अनेक सभा, बैठकांवर निर्बंध घालणारा ठरला आहे. तालुका पंचायतीकडून याबाबत अजून तरी आदेश काढण्यात आला नाही. मात्र कोरोनाचा फैलाव आटोक्मयात आल्यानंतर तातडीने ग्रामसभा घेण्यासाठी हालचाली करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामसभांमध्ये विविध विषयांवर चर्चा करून अनेक कामांचे ठराव संमत केले जातात. मात्र मागील दीड ते दोन वर्षांपासून ग्रामसभा झाल्याच नसल्याचे दिसत आहे. सध्या बेळगाव शहराबरोबरच तालुक्यातही संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी ग्रामसभा घेण्यात येणार नाहीत, अशीच शक्मयता आहे.