बुधवारी केंद्र सरकारने बेळगाव, बागलकोट, धारवाडसह कर्नाटकातील आठ जिल्हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत. राजधानी बेंगळूर, म्हैसूर, बेळगाव, बागलकोट, गुलबर्गा, विजापूर, धारवाड आदी जिल्हय़ात महामारीचा फैलाव झपाटय़ाने होत आहे.
महामारीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढविली आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीही पंतप्रधानांबरोबर झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सनंतर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याचे जाहीर केले होते. बुधवारी केंद्र सरकारने बेळगाव, बागलकोट, धारवाडसह कर्नाटकातील आठ जिल्हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत. राजधानी बेंगळूर, म्हैसूर, बेळगाव, बागलकोट, गुलबर्गा, विजापूर, धारवाड आदी जिल्हय़ात महामारीचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन-2 ची मार्गसूची जाहीर केली आहे. 20 एप्रिलनंतर ज्या जिल्हय़ात महामारीचा कहर नाही, अशा जिल्हय़ात लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्मयता आहे.
म्हैसूरमध्ये नंजनगुडजवळ ज्युबिलियंट नामक औषध तयार करणारा कारखाना आहे. या कारखान्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. या कारखान्यातील एका कामगारामुळे महामारीचा मोठय़ा प्रमाणात फैलाव झाला आहे. जसे कर्नाटकातील इतर भागात दिल्ली कनेक्शनमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे, तसेच ज्युबिलियंट कारखान्यातील एका कामगारामुळे म्हैसूर जिल्हय़ातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. गुरुवारी दुपारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार एका दिवसात 34 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली एका दिवसातील ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 313 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कर्नाटकात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ती प्रत्येकाची चिंता वाढवणारी आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीही कोरोनाचा फैलाव रोखता येईना.
गेल्या दोन दिवसात चिक्कबळ्ळापूर, म्हैसूर, गुलबर्गा, बागलकोट जिल्हय़ातील चौघा जणांचे अहवाल लक्षात घेता आरोग्य विभागही हादरून गेला आहे. मुधोळमधील 35 वषीय पोलीस, गुलबर्ग्यातील 14 महिन्याचे बालक, म्हैसूरमधील 72 वषीय वृद्ध व चिक्कबळ्ळापूरमधील 65 वषीय वृद्ध या चौघा जणांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा उलगडा होत नाही. कोणाच्या संपर्कामुळे झाली? हे चारही जण गेल्या एक-दोन महिन्यात कोठेही प्रवासाला गेले नाहीत. तरीही त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह कसा आला याची चौकशी सुरू आहे. याचाच अर्थ कोरोनाची वाटचाल तिसऱया टप्प्याकडे सुरू आहे का असा संशय बळावला आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मंजुनाथ यांच्यासह अनेकांनी सरकार व सर्वसामान्य नागरिकांना सावध राहण्याचे सांगून धोक्मयाचा इशारा दिला आहे. काटेकोरपणे सामाजिक अंतर राखले गेले नाही, स्वच्छतेवर भर दिला नाही, स्वतःला घरी बंदिस्त ठेवले नाही तर कोरोनाच्या सामूहिक संसर्गाचा धोका निश्चित आहे.
कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. त्याला व्यापक प्रयत्न व लॉकडाऊनला जनतेने दिलेला प्रतिसाद कारणीभूत आहे. राजधानी बेंगळूर असो किंवा बेळगाव असो, आता लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नाही, असे दिसून आले आहे. अनेक जिल्हय़ात संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवताना खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. अत्यंत अशास्त्राrय पद्धतीने क्वारंटाईन करण्यात येत आहे. एखाद्या वसतीगृहात 50 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवले तर त्यांना तेथेच खाणेपिणे पुरविले जाते. प्रशासनाच्या ढिलाईमुळे त्यांचे नातेवाईक येऊन त्यांना भेटतात, नाश्ता, खाणे-पिणे व फळे देऊन जातात. या पन्नास जणांच्या संख्येतील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या संपर्कातील उर्वरित चाळीस जणांचे काय? त्यांच्या संपर्कातील व त्यांना फळे द्यायला आलेल्यांचे काय होणार याचा विचारच केला जात नाही. म्हणून या गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत चालली आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपविली आहे. कष्टकरी व कामगारांना मदत पोहोचविणे, जे परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात त्या परिसरात काटेकोरपणे लॉकडाऊनचे नियम लागू करणे, फळे, भाजीपाला, खत, किटकनाशके पुरविण्याची साखळी अबाधित ठेवणे, रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्यवाटप करणे व आरोग्य सेवा पुरविणे आदी जबाबदाऱया मंत्र्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. कर्नाटकात रोज 1,500 जणांची स्वॅब तपासणी केली जात आहे. सध्याची आकडेवारी लक्षात घेता शंभर जणांच्या तपासणीतून एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
प्लेगच्या महामारीमुळे एकेकाळी समाजात कहर माजला होता. सध्याच्या पिढीने ती परिस्थिती पाहिलेली नाही. जुनेजाणते त्यावेळच्या परिस्थितीबद्दल सांगत असतात. आता प्लेगपेक्षाही भयानक महामारीचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर आजमितीला तरी जगात औषधाचा शोध लागला नाही. अनेक देशांनी संशोधन हाती घेतले आहे. तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना थोपविण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे. म्हणून राज्याच्या, देशाच्या आर्थिक घडीचा विचार न करता लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये बऱयाच प्रमाणात कोरोनाला रोखणे शक्मय झाले आहे. केवळ सरकार, पोलीस, आरोग्य यंत्रणेचीच ही जबाबदारी नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तरच कोरोनाला रोखता येणार आहे. नाहीतर सामूहिकरीत्या फैलाव होण्याची भीती आहेच. आजवर ज्या ज्या देशांनी वेळीच खबरदारी घेऊन लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला नाही अशा देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे तांडव माजले आहे. भारतात लॉकडाऊनमुळे परिस्थिती आशादायक आहे.