ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासात 15 हजार 229 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 25, 617 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 307 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 54 लाख 86 हजार 206 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.68 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,57,74,626 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,91,413 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 15,66,490 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 2 लाख 04 हजार 974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : 16,612 रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईत मागील 24 तासात 961 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 897 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,08,968 वर पोहचली असून त्यातील 6,75,193 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 14,965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.