ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. त्यातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत किंचित घट दिसून आली. सोमवारी 47,228 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 155 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 50 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. यासोबतच राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 30 लाख 57 हजार 885 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 56 हजार 033 एवढा आहे.
कालच्याा एका दिवसात 26,252 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 25 लाख 49 हजार 075 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 % तर मृत्युदर 1.83 % इतका आहे.
- मुंबईत 9,857 नवे रुग्ण; 21 मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 9,857 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 21 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 62 हजार 302 वर पोहचली आहे. त्यासोबतच कालच्या दिवसात 3,357 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. तर 3,74, 985 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,797 इतकी आहे. सद्य स्थितीत 72 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांचा आहे.