खानापूर तालुक्यातील पत्रकारांचा बिडी येथे सत्कार : मान्यवरांकडून पत्रकारांबद्दल गौरवोद्गार
वार्ताहर /खानापूर
कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला जागृत करण्याबरोबर सामाजिक आपुलकी राखण्यासाठी पत्रकारांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात सत्यता व समाजाला प्रबोधन करण्यासाठी पत्रकार नेहमी अग्रेसर असतात. म्हणून पत्रकार हे खऱयाअर्थाने कोरोना वॉरियर्स म्हणून पहिल्या फळीतील कार्यकर्ते गणले गेले आहेत. त्यांचा गौरव होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उद्गार अवरोळी येथील युवा कार्यकर्ते ज्योतिबा भरमप्पणावर यांनी काढले. मंगळवारी बिडी येथील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वागत कुरगुंद यांनी करून, खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व तालुक्मयातील सर्व पत्रकारांचा शाल, श्रीफळ देऊन ज्योतिबा भरमप्पनावर यांनी सत्कार केला. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांनी पत्रकारांचा सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पिराजी कुऱहाडे, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष वासुदेव चौगुले, सेपेटरी प्रसन्ना कुलकर्णी, संघटनेचे पदाधिकारी अल्ताफ बसरीकट्टी, कासीम हट्टीहोळी, अप्पाजी पाटील, शंकर देसूरकर, कुरगुंद सर, भरत पाटील, रुदेश संपगावीसह अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांच्यासमवेत बिडी प्राथमिक कृषी पत्तीनचे अध्यक्ष असरफ तासेवाले, केरवाड कृषी पत्तीनचे अध्यक्ष विठ्ठल हिंडलकर, महाबळेश्वर चवलगी, रवी बनोसी, शिवानंद कोडोळी, विठ्ठल पेजोळी आदी उपस्थित होते.