जिह्यात 857 कोरोना पॉझेटिव्ह, तालुक्यातील 270 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी वाढतच चालली असून शनिवारी तर कोरोना रुग्णांच्या संख्येने विक्रमी नोंद केली आहे. जिह्यात तब्बल 857 रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ माजली असून सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी 442 रुग्णांची नोंद झाल्यानंतर दुसऱया दिवशी हा आकडा दुप्पट झाला आहे. तर तालुक्मयात 270 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी देखील याबाबत जनतेने गांभीर्य घेतले नसल्यानचे दिसून येत आहे. वास्तविक हा आकडा पाहता सर्वांनीच अतिदक्षता घेणे महत्वाचे आहे. असे असताना नागरिकांचा मुक्त संचार धोकादायक ठरणार आहे. यामुळे डॉक्टर्स व आरोग्य खात्यातून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
मागीलवेळेपेक्षा कोरोनाची ही लाट भयानक आहे. मागीलवेळी लॉकडाऊन असल्यामुळे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा प्रसाद मिळत असल्याने जनतेने लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले होते. असे असताना यावेळी क्लोजडाऊन करण्यात आले. या काळात सकाळी 6 ते 10 अत्यावश्यक सेवा सुरू केल्या आहेत. मात्र दररोज खरेदीसाठी झुंबड उडत आहे. विवाह कार्यक्रमही सुरू आहेत. त्यामुळे हा आकडा वाढत चालल्याचे बोलले जात आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही प्रमाणात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 360 जणांचा बळी गेला आहे. ही बाबही गंभीरतेने घेणे महत्वाचे आहे. अन्यथा मोठा धोका निर्माण होण्याची भिती नाकारता येत नाही. आरोग्य विभाग जनतेला आवाहन करत आहे. तरी देखील त्या आवाहनाकडे दुर्लक्ष होत आहे. तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा आणि सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. तेंव्हा याबाबत आता गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे. अन्यथा मोठय़ा समस्येला साऱयांनाच सामोरे जावे लागणार आहे.
शनिवारी टिळकवाडी, वडगाव, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी, खासबाग, विद्यानगर, अनगोळ, आंबेडकरनगर, अंजनेयनगर, अशोकनगर, अजमनगर, बसव कॉलनी, भाग्यनगर, भांदुर गल्ली, भातकांडे गल्ली, बिम्स् हॉस्पिटल यासह मुतगा, सांबरा, विजयनगर, येळ्ळूर, एटीएस, गणेशपूर, धामणे, बस्तवाड, काकती, कंग्राळी के. एच., मच्छे, मोतगा, मुचंडी या परिसरात पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गांभीर्य घेणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागामध्ये मास्क नसतानाच दिसत आहे. ग्राम पंचायतच्या माध्यमातून जनजागृती होत आहे. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात 38 ते शहरी भागात 232 रुग्ण आढळले आहेत. मागीलवेळेपेक्षाही भितीचे वातावरण आहे. तेंव्हा प्रत्येकाने गांभर्य घ्यावे असे आवाहन आरोग्य खात्यातून करण्यात आले आहे.